Homeबॅक पेजचेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः रोहित मिरजकरची विजयी सलामी

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत पुण्याच्या रोहित मिरजकरने मुंबईच्या श्रीकृष्ण प्रधानचा २५-०, २०-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी चेंबूर जिमखान्याच्या अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी चेंबूर जिमखान्याचे मानद सरचिटणीस डॉ. मनिष शर्मा, प्रशासकीय मानद सरचिटणीस श्याम अगरवाल, सल्लागार सुरिंदर शर्मा, कॅरम विभाग सचिव बाळकृष्ण परब, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभय हडप तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व सहसचिव केतन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष एकेरी गटाचे इतर निकाल पुढीलप्रमाणे-

बाळकृष्ण मते (ठाणे) वि वि राकेश शेट्ये (मुंबई उपनगर) २५-७, २४-५

आतिष कल्याणकर (रायगड) वि वि सुदर्शन पैठणकर (मुंबई उपनगर) २५-०, २०-१६

मनोज बेकार (मुंबई) वि वि संजीव मुळगावकर (पालघर) २५-१४, १२-९

प्रशांत म्हात्रे (सिंधुदूर्ग) वि वि उदय बने (मुंबई उपनगर) २५-११, ३-२५, २५-३

हर्षद डांगी (मुंबई उपनगर) वि वि कलीम अहमद अन्सारी (धुळे) ०-२५, २५-१९, २३-१३

अमर भोसले (मुंबई उपनगर) वि वि विक्रांत नाईक (मुंबई) १७-९, १-२५, २५-६

संतोष जाधव (मुंबई) वि वि रईस शेख (जळगाव) २२-१२, २५-१०

निरंजन चारी (पालघर) वि वि महर्षी देसाई (मुंबई उपनगर) २५-०, २५-९

अब्दुल शेख (मुंबई उपनगर) वि वि दयानंद चोथे (ठाणे) २५-११, १३-१७, २५-१६

मेहराज शेख (नाशिक) वि वि रमेश ह्सगेकर (मुंबई उपनगर) २५-०, २५-०

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content