Homeचिट चॅटएमजेएससी कॅरम स्पर्धेत...

एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य

मुंबईच्या माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता ठरला. १०-९ अशी आघाडी घेणाऱ्या राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतला निर्णायक बोर्डातील अप्रतिम फिनिशद्वारे १५-९ असे पराभूत केले. शेवटचा बोर्ड हातचा निसटल्यामुळे आर्यन राऊतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक यशवंत किल्लेदार, क्लबचे पदाधिकारी सुनील पाटील, महेश शेट्ये, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिवाजीपार्क येथील एमजेएससी स्पर्धेमधील उपांत्य फेरीत आर्यन राऊतने शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेचेला तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवला नमवले. विविध जिल्ह्यातील ४२ शालेय खेळाडूंमध्ये होली फॅमिली हायस्कूल-अंधेरीची चैतन्या पोमेंडकर, पाटकर हायस्कूल-डोंबिवलीचे प्रसाद माने व शिवांश मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण, सीएनएम स्कूलचे अर्णव शाह व दैविक जैन, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची सारा देवन यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार स्ट्रायकरसह पटकाविला.

स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना रुपये पाचशेचा विशेष पुरस्कार देण्यात आला.

Continue reading

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीला लागणार परवाना!

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, या दागिन्यांची आयात आता ‘फ्री’ ऐवजी ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आली असून, आयातीसाठी पूर्वपरवानगी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....
Skip to content