Homeकल्चर +चेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः रियाझ अकबर अली चौथ्या फेरीत

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीने मुंबईच्या दीपक कांबळेवर २५-२०, २५-१८ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे मुंबईच्या कौस्तुभ जागुष्टेने मुंबई उपनगरच्या सुहास पोमेंडकरवर तीन सेटमध्ये १३-२५, २४-१४, २५-७ असा विजय मिळवून आगेकूच केली. 

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

निलांश चिपळूणकर (मुंबई) वि वि विजय टेमघरे (रायगड)

ब्लेसिंग सॅमी (ठाणे) वि वि खान इस्माईल महम्मद इब्राहिम (मुंबई उपनगर)

संजय मांडे (मुंबई) वि वि जावेद सय्यद (मुंबई उपनगर) 

अभिजित त्रिपनकर (पुणे) वि वि रमेश देवकुळे (ठाणे)

सिद्धांत वाडवलकर (मुंबई) वि वि लियाकत नागरजी (मुंबई)

विवेक पोदार (मुंबई) वि वि विपुल बाबारिया (मुंबई)

विवेक कांबळे (मुंबई उपनगर) वि वि तेजस म्हात्रे (मुंबई)

असगर शेख (मुंबई उपनगर) वि वि कुलदीप वाघधरे (मुंबई)

रहीम खान (पुणे) वि वि महेंद्र वाघ (मुंबई)

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content