Homeकल्चर +‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (वन्यजीव) डॉ. विनया जंगले प्रमुख अतिथी तसेच ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लेखक श्रीरंग फडके यांचे ‘रानसावल्या’ हे पुस्तक गोव्याच्या ब्रॉडवे प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकास गोव्यातील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात १४ कथा/लेख/निबंध असून लेखकाच्या अनुभवावरून त्या नोंदल्या आहेत. त्यातले काही लेखकाचे स्वतःचे अनुभव असून काही ऐकलेल्या गोष्टी आहेत. काही कथा काल्पनिक असून सत्याच्या जवळ जाणाऱ्या आहेत. काही व्यक्तिचित्रे आहेत. थोडक्यात म्हणायचं झाल्यास हे निसर्गसाहित्य आहे. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लोकांनी आपापले अनुभव, लेख, कथा लिहिल्या आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरूपात पुढे चालू ठेवण्यासाठी छोटं योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचं लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

या पुस्तकाचं मूल्य रुपये ४००/- असून प्रकाशनाच्या दिवशी प्रकाशनस्थळी वाचकांसाठी ते रुपये ३५०/- ला दिले जाईल. अधिक माहितीसाठी किंवा पुस्तकासाठी लेखक श्रीरंग फडके यांच्याशी ९९२०३९०१०९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा shreerang.kanha@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content