Homeटॉप स्टोरीराज ठाकरे आता...

राज ठाकरे आता पुणे, नाशिकही ओलांडणार!

महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवर अवलंबून न राहता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करणार आहेत. याचसाठी राज ठाकरे येत्या ४ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या सत्तेतील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच राज्यभरातून आपल्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्यानंतर ठाकरे परदेशात गेले होते. १५ दिवसांनी

आल्यानंतर त्यांनी या अहवालाचा अभ्यास केला. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणाही केली. येत्या विधानसभा निवडणुकीत २००पेक्षा जास्त जागा लढविण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.

एरव्ही राज ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे मुंबईबाहेर पडल्यास मुणे आणि नाशिकपर्यंतच जाता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर मनसेचे कार्यकर्ते व या हल्लाप्रकरणातील आरोपी जय मालोकर यांच्या मृत्त्यूनंतर अमित ठाकरे यांचे अमरावतीला जाणे झाले इतकेच लक्षात राहणारी बाब आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय कक्षा आता रुंदावत आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content