Homeटॉप स्टोरीआता भारतीय बॅटरी...

आता भारतीय बॅटरी दुमडा, अगदी कागदासारखी!

भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडेच अत्यंत लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी विकसित केली असून शाश्वत ऊर्जेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. शास्त्रज्ञांनी एक नवीन बॅटरीतंत्रज्ञान विकसित केले आहे, जे बॅटरीला कागदासारखे दुमडण्याइतके लवचिक बनवते आणि कोणतीही खबरदारी न घेता स्पर्श करण्यासाठीही ती सुरक्षित आहे.

सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरी जास्त गरम झाल्यानंतर त्यांचा स्फोट होण्याची भीती असते. परंतु, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेसच्या बेंगळुरूतल्या संशोधकांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या सहकार्याने एक नवीन बॅटरीतंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि परिधान करण्यायोग्य उपकरणांमध्ये (wearable devices) वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीला पर्याय ठरू शकते. या नवीन बॅटरीमध्ये पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अल्युमिनियमचा आणि जलाधारित द्रावणाचा वापर केला जातो. हे मिश्रण बॅटरीला अधिक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणासाठी अधिक अनुकूल बनवते. यामुळे बॅटरीचा स्फोट आणि पर्यावरणीय धोक्यांपासून संरक्षण मिळू शकते. तसेच उपकरणांची विजेची गरजही कमी होऊ शकते.

अल्युमिनियममध्ये ऊर्जा साठवण्याची आणि सोडण्याची क्षमता जास्त असलीतरी, त्याच्या जटिल रसायनशास्त्रामुळे त्याचा वापर करणे कठीण होते. शास्त्रज्ञांनी सूक्ष्म स्तरावर सामग्रीमध्ये बदल करून या समस्यांचे निराकरण केले आहे. ही नाविन्यपूर्ण बॅटरी कार्यक्षमतेने आणि विश्वसनीयतेने ऊर्जा साठवते. 150 चार्ज-डिस्चार्ज सायकलनंतरही ती आपली 96.77% ऊर्जा टिकवून ठेवते. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते. ही बॅटरी वाकवली किंवा पूर्णपणे अर्धी दुमडली तरीही काम करते. हे दाखवण्यासाठी, शास्त्रज्ञांनी बॅटरीला तीव्र कोनात वाकवल्यावरही एका एलसीडी डिस्प्लेला सतत ऊर्जा दिली. यामुळे भविष्यात कपड्यांमध्ये सहजपणे जोडता येण्यासारखी रोलअप गॅजेट्स विकसित करण्यास मदत होऊ शकते.

शास्त्रज्ञांनी बॅटरीचे घटक उच्च कार्यक्षमतेसाठी संतुलित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रगत सूक्ष्म साधनांचा वापर केला. त्यांनी बॅटरीची कार्यक्षमता, टिकाऊपणा व लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी कठोर चाचण्या घेतल्या. या शोधामुळे अनेक दैनंदिन उपकरणांसाठी महत्त्वाचे फायदे मिळतील. लवचिक स्मार्टफोन, सुरक्षित इलेक्ट्रिक वाहने आणि कपड्यांमध्ये जोडलेली परिधान करण्यायोग्य उपकरणे यांचा विकास यामुळे शक्य होऊ शकतो. याशिवाय, अल्युमिनियमचा वापर व्यापक शाश्वततेच्या ध्येयांना पाठबळ देतो. हा शोध मल्टीव्हॅलंट आयन बॅटरी तंत्रज्ञानातील मोठी झेप आहे. सध्या सुरू असलेल्या सुधारणांमुळे अशा बॅटरी लवकरच आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहारांमध्ये एक मानक बनू शकतात आणि देशाला सुरक्षित, शाश्वत आणि जागतिक पर्यावरणीय उद्दिष्टांशी संलग्न असलेल्या पुढच्या पिढीच्या ऊर्जा साठवणुकीच्या पर्यायांच्या विकासात भारताला आघाडीवर ठेवू शकतात.

Continue reading

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...

शांततेसाठी ट्रम्पची मोदींना साद; फोनवरून केली सविस्तर चर्चा

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इस्रायल-लेबनॉन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही जागतिक नेत्यांमधील ही चर्चा अत्यंत कळीच्या वेळी झाली असून, यामुळे जागतिक शांततेच्या प्रयत्नांना नवी गती मिळण्याची...

क्रिप्टो मार्केटमध्ये ‘बुल रन’! बिटकॉइनने ओलांडला $ ७५,०००चा टप्पा

जागतिक स्तरावर क्रिप्टो मार्केटमध्ये सध्या मोठी लाट पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉइनने ७५,००० डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. केवळ बिटकॉइनच नाही, तर इथरियम आणि सोलाना यांसारख्या इतर चलनांमध्येही मोठी वाढ...
Skip to content