Homeएनसर्कलउद्यापासूनच्या अकृषी विद्यापीठांच्या...

उद्यापासूनच्या अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन!

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या अत्यंत कडक निर्बंधांमुळे उद्यापासून होणाऱ्या राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केला.

सरकारने लागू केलेले निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. यामध्ये संचारबंदीचादेखील समावेश आहे. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचे नियोजनदेखील काहीसे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्यापासून १३ अकृषी विद्यापीठांमधल्या सर्व वर्षांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे ते म्हणाले.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते. विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरूदेखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

परीक्षा ऑनलाईन

कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण कठीण झाल आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविले. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंना करण्यात आली आहे. या परीक्षांमधून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हा निर्णय उद्यापासूनच लागू करण्यात येईल. सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण उद्यापासून त्या शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरूंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी संबंधित विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश असेल, असेही सामंत म्हणाले.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content