Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांनो, अर्थसंकल्पासाठी पालिकेला...

मुंबईकरांनो, अर्थसंकल्पासाठी पालिकेला पाठवा सूचना!

मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबईकर नागरिकांना येत्या १७ जानेवारीपर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई-मेलवर सूचना कराव्या, असे आवाहन पालिकेने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर शुक्रवार, दिनांक १७ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. हे अर्थसंकल्पीय अंदाज येत्या ५ फेब्रुवारीला अथवा तत्पूर्वी सादर करण्‍यात येणार आहे. या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५पर्यंत ई-मेल आयडी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in यावर सूचना पाठवाव्यात. ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहोचेल, अशा बेताने खालील पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ताः

प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय,
चौथा मजला, विस्तारित इमारत,
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content