Homeकल्चर +महाराष्ट्र राज्य हौशी...

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी आजपासून

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ची अंतिम फेरी मुंबईतल्या वांद्र्याच्या रंगशारदा नाट्यगृहात आजपासून सुरू होत आहे. येत्या १५ मार्चपर्यंत या फेरीतल्या स्पर्धा चालणार असून त्यात रसिकांसाठी ४५ नाटकांची मेजवानी असेल. या नाटकांचा आनंद लुटण्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. विनामूल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम व द्वितीय पारितोषिकप्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ आज सायंकाळी ७.०० वाजता सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या अंतिम फेरीमध्ये १२००हून अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघांचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीतजास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content