Homeकल्चर +महाराष्ट्र राज्य हौशी...

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी आजपासून

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ची अंतिम फेरी मुंबईतल्या वांद्र्याच्या रंगशारदा नाट्यगृहात आजपासून सुरू होत आहे. येत्या १५ मार्चपर्यंत या फेरीतल्या स्पर्धा चालणार असून त्यात रसिकांसाठी ४५ नाटकांची मेजवानी असेल. या नाटकांचा आनंद लुटण्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. विनामूल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम व द्वितीय पारितोषिकप्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ आज सायंकाळी ७.०० वाजता सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या अंतिम फेरीमध्ये १२००हून अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघांचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीतजास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Continue reading

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार...
Skip to content