Homeमुंबई स्पेशलमुंबईत उद्यापासून कीर्तन...

मुंबईत उद्यापासून कीर्तन महोत्सव! घळसासींचे पदार्पण!!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला येत्या विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहे. संघशताब्दीच्या निमित्ताने मुंबईतल्या गोरेगावात शारदीय नवरात्रात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मसुराश्रम आणि संस्कार भारती (उत्तर पश्चिम समिती कोकण प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात हा कीर्तन महोत्सव होणार आहे. दररोज सायंकाळी ४-३० ते ६-३० या वेळात गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडीमधील मसुराश्रमसह आगाशीचे श्रीभवानी शंकर मंदिर आणि श्रीराम मंदिर, मालाड पश्चिम येथेही कीर्तने होणार आहेत. या कीर्तनमालेत ह.भ.प. चंद्रशेखर अभ्यंकर, संजय पंडित, केतन गुप्ता, विजया वैशंपायन, उमेश घळसासी, माधुरी नवरे, शिवानी नेमावरकर, सुयोग आपटे, विकास दिग्रसकर , संकेत भोळे, आदी कीर्तनकार सहभागी आहेत. या कीर्तनमालेतून अभिनेते, नाट्य-चित्रपट आणि मराठीचे व्याख्याते उमेश घळसासी कीर्तनविश्वात पदार्पण करत आहेत.

कीर्तन

आज देशभरात संघाचे व्यापक रूप साकारले आहे. हिंदुत्वाचा आणि भारतीयत्वाचा विचार तळागाळापर्यंत रुजवणाऱ्या रा. स्व. संघाच्या स्थापनेला २ ऑक्टोबर २०२५, विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या विस्तारासाठी अगणित प्रचारकांनी आपल्या समिधा वाहिल्या. या संघऋषिंच्या समर्पणातूनच आजचे संघाचे स्वरूप साकारले आहे. अशा दहा महानुभाव संघऋषिंच्या समर्पणाची गाथा या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. या महानुभावांमध्ये आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकर गुरूजी, वं. मावशी केळकर, दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे, नानाजी देशमुख, हरिभाऊ वाकणकर, बाळासाहेब देशपांडे, यादवराव जोशी, लक्ष्मणराव इनामदार यांचा समावेश आहे. प्रतिदिन यातील एखाद्या व्यक्तिमत्वावर कीर्तन होणार आहे.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content