Homeपब्लिक फिगरकोविडसाठी ५० टक्के...

कोविडसाठी ५० टक्के खाटा आरक्षित करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे शहरातली कोव्हिड-१९च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील खासगी इस्पितळात ५० टक्के बेड आरक्षित करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी सूचना राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीम गोऱ्हे यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

कोव्हिड-१९च्या रुग्णांची संख्या कमी होत असताना अचानक यात वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या आलेखातून निदर्शनास येत आहे. मार्चनंतर आजतागायत संख्या कमी करण्यासाठी आपल्या नियोजनाला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे. आज एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मुलाखत देताना सांगितले की, हॉस्पिटलमध्ये कोव्हिडच्या रुग्णांना घेऊन गेल्यानंतर जनरल बेड उपलब्ध नसतात. आयसीयूमध्ये कोव्हिडव्यतिरिक्त इतर रुग्णांना प्रवेश दिले जातात.   परिणामी रुग्णांची आणि नातेवाईकांची हेळसांड होताना दिसत आहे. लसीकरण सध्या सुरू असले तरी ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

पूर्वीच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीदेखील नियमात शिथिलता आल्याने रुग्णांत सध्या वाढ होताना दिसत आहे. तरी पुढील सहा महिने कोव्हिड रुग्णांसाठी सर्व इस्पितळात जनरल वॉर्डात आणि आयसीयूमध्ये ५० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content