Homeपब्लिक फिगरमराठा आरक्षणाबाबत राज्य...

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची इच्छाच नाही?

राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण, तशी सरकारची इच्छाशक्ती हवी. या विषयावर सरकारने ११ न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जावे तसेच या विषयावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयन राजे भोसले यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

राज्यात मराठा समाजाचे इतक्या प्रमाणात मोर्चे निघाले. आत्महत्त्या झाल्या गायकवाड समितीने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबद्दल आरक्षण द्यावे, अशी शिफारस केली. अशावेळी ५० टक्के आरक्षणाच्या चौकटीत न राहता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. तामिळनाडूसह ११ राज्ये तसा निर्णय घेऊ शकतात. पण, येथे सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही, असे ते म्हणाले.

तसा निर्णय घेतला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे सरकार म्हणते. तसा अवमान झाल्याचा मुद्दा आला तर तर तो आमच्यावर ढकला. आम्ही त्याला तोंड देऊ. डान्स बारच्या संदर्भात तीन वेळा न्यायालयाचा अवमान सरकारने केलाच ना, मग तेव्हा कसा निर्णय घेतला, असा सवाल त्यांनी केला. आज मराठा समाजाचा तरूण दिशाहीन झाला आहे. एकदा वेळ निघून गेली की मग काही करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content