Homeटॉप स्टोरीइराणने युद्धविराम तोडला!

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या युद्धनौकेला दोनदा परतण्याचा इशारा दिला. परंतु युद्धनौकेने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर इराणने या युद्धनौकेवर मिसाईलने हल्ला केला. त्यानंतर ही युद्धनौका माघारी फिरल्याचे कळते. याशिवाय आज दिवसभरात इराणने संयुक्त अरब अमिरातीत चारवेळा हल्ले केले. मिसाईलने केलेले हे हल्ले परतवले असल्याचे अमिरातीने म्हटले आहे.

होर्मूझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण आहे. हा हल्ला करून इराणने अमेरिकेला हेच पुन्हा दाखवून दिले आहे. या परिसरात नाकेबंदी करून इराणला जेरीस आणण्याच्या प्रयत्नात अमेरिका ही नाकेबंदी अधिक कडक करण्याच्या प्रयत्नात आहे. नाकेबंदी हटवल्याशिवाय अमेरिकेबरोबर युद्धविरामाच्या दृष्टीने चर्चा करणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. अमेरिकेकडून आपल्यावर हल्ला झाल्यास आखाती देशांना उद्ध्वस्त केले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे. या घटनेनंतर अमेरिका व इस्त्रायलकडून जोरदार हल्ले केले जाण्याची शक्यता ओळखून इराणने देशभर अलर्ट जारी केला आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या फुजैराह फोर्टमधल्या रिफायनरीवरही इराणने ड्रोनहल्ला केला. त्यामुळे रिफायनरीला आग लागली. यात तीन भारतीय जखमी झाल्याचेही कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content