Homeपब्लिक फिगर2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था...

2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर

भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता 5व्या क्रमांकावर असून 2039मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत जगात जागतिक महासत्ता होईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच व्यक्त केला.

दुबईमधील बुर दुबईतील एम स्क्वेअर येथील हिल्टन डबल ट्री, या हॉटेलमध्ये इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल काऊन्सिलतर्फे ग्रीन माईंड्स, या  प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी पुनर्वापर आणि चिरकाल टिकणारे उपाय, या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी संयुक्त अरब अमीरात सरकारचे  पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया विषयाचे सल्लागार महेर अल काबी रीना वीज; विजय बैंस; समिअल्लाह खान; कार्तिक रमण आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश सर्व आघाड्यांवर सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून संपूर्ण जगातून  भारतात उद्योग, व्यवसाय विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारताने संयुक्तपणे प्रयत्न करून दोन्ही देशांत व्यापार-उद्योग वाढविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

संयुक्त अरब अमीरातचे राजे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये विशेषतः दुबईत मोठ्या प्रमाणात भारतीय व्यापार आणि वास्तव्य करीत आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही. त्यांना सरकारचे चांगले सहकार्य मिळत असते. भारताची राजधानी दिल्ली आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई आहे तसेच संयुक्त अरब अमीरातची राजधानी अबुधाबी आहे आणि आर्थिक राजधानी दुबई आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारत या दोन्ही देशांनी मिळून पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देऊ; व्यापार-उद्योग वाढवू तसेच जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करूया. भारतात मोदी सरकारच्या नेतृत्त्वात सौर ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर होत आहे. प्लास्टिकमुक्त शहरे करण्यासाठी भारतात प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने जगात सर्वच देशांनी पर्यावरण रक्षणाचा संवर्धनाचा विचार करावा असे आवाहनही रामदास आठवलेंनी केले.

या परिषदेस भारतातून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, तोसिफ पाशा आणि जावेद अहमद उपस्थित होते. 

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content