Homeडेली पल्समहाराष्ट्रात पुढचे तीन...

महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार!

भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट लागू आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

रेड अलर्ट: ४ ऑगस्ट – सातारा, पुणे आणि पालघर

ऑरेंज अलर्ट: ४ ऑगस्ट – सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, ५ ऑगस्ट – सातारा

यलो अलर्ट: संपूर्ण विदर्भ (३ ते ७ ऑगस्ट), कोल्हापूर (४ ऑगस्ट) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर (५ ऑगस्ट), रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा (६ ऑगस्ट)

Continue reading

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...
Skip to content