Homeकल्चर +राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी...

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले ‘मोदीज मिशन’चे प्रकाशन

बर्जिस देसाई लिखित “मोदीज मिशन” या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजभवन येथे आज झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेचे आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. मोदी यांनी आपल्या आयुष्यात अनेक अशक्य वाटणारे निर्णय घेतले, जसे कलम ३७० रद्द करणे, रामजन्मभूमीचा प्रश्न शांततेत सोडवणे. जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवणे, हे त्यांच्या दृढ इच्छाशक्तीचे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. देश, समाज आणि मानवतेच्या सेवेसाठी सतत कार्य करणे, हीच त्यांची साधना आहे, असे राज्यपाल देवव्रत यांनी याप्रसंगी सांगितले.

‘मोदीज मिशन’मधून राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची जी पायाभरणी केली आहे, ती अवर्णनीय आहे. या पुस्तकात मोदी यांच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही, तर एका व्यक्तीच्या मूल्यांची, जाणीवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याच्या वृत्तीची निर्मिती कशी होते, हे दाखवले आहे. मोदी यांनी सेवा आणि संन्यास या दोन्ही मार्गांचा अनुभव घेतल्यानंतर, संघकार्याद्वारे राष्ट्रभावना जागृत करण्याचा संकल्प केला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली देशात 370 कलम रद्द करणे, राममंदिर उभारणी, नागरिकत्व कायदा किंवा तिहेरी तलाक बंदी यांसारखे ऐतिहासिक निर्णय झाले. या सर्व निर्णयांच्या मागे राष्ट्रचेतनेची जाणीव असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मोदी म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त एक व्यक्तिमत्व नाहीत, तर देशाचे वर्तमान आणि भविष्य आहेत. त्यांच्या कामगिरीचा प्रवास संघर्षमय असून, तो प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. हे पुस्तक फक्त नरेंद्र मोदींच्या चरित्राचे वर्णन नाही, तर त्यांच्या कार्याची सत्यकथा आहे. मोदींच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती एका पुस्तकात सामावणे शक्य नाही, कारण त्यांनी अशक्याला शक्य करून दाखवले आहे. मागील अकरा वर्षांत भारतात झालेले सकारात्मक बदल जगभरात कौतुकास्पद ठरले आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमात “मोदीज मिशन” पुस्तकाचे लेखक बर्जिस देसाई यांनीही विचार मांडले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content