Homeटॉप स्टोरी१ मेपासून शैक्षणिक...

१ मेपासून शैक्षणिक साहित्य मिळवा नाममात्र दरात!

भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीच्या ज्ञानसंवर्धनासाठी लागणारी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक स्वस्तात उपलब्ध होण्याकरीता येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून (येत्या गुरूवारपासून) टपाल खात्यातर्फे ‘ज्ञान पोस्ट’ नावाची सेवा सुरू करण्यात येत आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सेवेसाठी राजपत्र अधिसूचनेच्या प्रकाशनाची काल घोषणा केली.

शैक्षणिक

भारतीय टपाल कार्यालयांद्वारे पुस्तके व अध्ययन साहित्य परवडणाऱ्या दरात पोहोचवण्यासाठी ही नवी सेवा आहे. ज्ञान पोस्ट, ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वितरण यंत्रणा राहणार आहे. या सेवेचा उद्देश संपूर्ण भारतात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक परवडणाऱ्या दरात वितरित करणे हा आहे. ही सेवा शिक्षणाला पाठिंबा देण्याबाबतच्या भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.

शिक्षण ही मजबूत भविष्यासाठीची पायाभूत गोष्ट आहे. मात्र शिकण्याच्या साधनांपर्यंतची पोहोच भौगोलिक स्थान किंवा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असू नये, यादृष्टीने ‘ज्ञान पोस्ट’ ही सेवा तयार करण्यात आली आहे, जेणेकरून कोणतेही पाठ्यपुस्तक, तयारी मार्गदर्शक किंवा सांस्कृतिक पुस्तक शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे अगदी दुर्गम खेड्यांपर्यंतही पोहोचू शकेल, असा विश्वास सिंधिया यांनी यावेळी व्यक्त केला. अभ्यास आणि ज्ञानवाटपाला मदत करण्यासाठी ‘ज्ञान पोस्ट’ सेवा परवडणाऱ्या दरात पुस्तके आणि मुद्रित शैक्षणिक साहित्य भारतातील विस्तृत टपाल जाळ्यातून पाठविण्याचा पर्याय देते. ही सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीकोनातून याचे दर आकारण्यात येणार आहेत. ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवली जाणारी पुस्तके व मुद्रित शैक्षणिक साहित्य पाठपुरावा करण्यायोग्य असेल आणि ते भूमार्गाने पाठवले जाईल, ज्यामुळे खर्च कमी होईल. ही पार्सल सेवा अतिशय परवडणाऱ्या दरात पाठवता येईल. ३०० ग्रॅम वजनाच्या पॅकेटसाठी फक्त २०  रुपयांपासून पाच किलोग्रॅमपर्यंतच्या पाकिटासाठी जास्तीतजास्त १०० रुपयांपर्यंत (कर वगळता) याचा दर असेल. फक्त व्यावसायिक नसलेले शैक्षणिक साहित्यच ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवण्यासाठी पात्र असेल. ‘ज्ञान पोस्ट’ सेवा भारतातल्या सर्व विभागीय टपाल कार्यालयांमध्ये १ मे २०२५पासून कार्यान्वित होईल. अधिक माहितीसाठी जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content