Homeटॉप स्टोरी१ मेपासून शैक्षणिक...

१ मेपासून शैक्षणिक साहित्य मिळवा नाममात्र दरात!

भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीच्या ज्ञानसंवर्धनासाठी लागणारी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक स्वस्तात उपलब्ध होण्याकरीता येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून (येत्या गुरूवारपासून) टपाल खात्यातर्फे ‘ज्ञान पोस्ट’ नावाची सेवा सुरू करण्यात येत आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सेवेसाठी राजपत्र अधिसूचनेच्या प्रकाशनाची काल घोषणा केली.

शैक्षणिक

भारतीय टपाल कार्यालयांद्वारे पुस्तके व अध्ययन साहित्य परवडणाऱ्या दरात पोहोचवण्यासाठी ही नवी सेवा आहे. ज्ञान पोस्ट, ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वितरण यंत्रणा राहणार आहे. या सेवेचा उद्देश संपूर्ण भारतात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तके अधिक परवडणाऱ्या दरात वितरित करणे हा आहे. ही सेवा शिक्षणाला पाठिंबा देण्याबाबतच्या भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.

शिक्षण ही मजबूत भविष्यासाठीची पायाभूत गोष्ट आहे. मात्र शिकण्याच्या साधनांपर्यंतची पोहोच भौगोलिक स्थान किंवा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असू नये, यादृष्टीने ‘ज्ञान पोस्ट’ ही सेवा तयार करण्यात आली आहे, जेणेकरून कोणतेही पाठ्यपुस्तक, तयारी मार्गदर्शक किंवा सांस्कृतिक पुस्तक शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे अगदी दुर्गम खेड्यांपर्यंतही पोहोचू शकेल, असा विश्वास सिंधिया यांनी यावेळी व्यक्त केला. अभ्यास आणि ज्ञानवाटपाला मदत करण्यासाठी ‘ज्ञान पोस्ट’ सेवा परवडणाऱ्या दरात पुस्तके आणि मुद्रित शैक्षणिक साहित्य भारतातील विस्तृत टपाल जाळ्यातून पाठविण्याचा पर्याय देते. ही सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीकोनातून याचे दर आकारण्यात येणार आहेत. ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवली जाणारी पुस्तके व मुद्रित शैक्षणिक साहित्य पाठपुरावा करण्यायोग्य असेल आणि ते भूमार्गाने पाठवले जाईल, ज्यामुळे खर्च कमी होईल. ही पार्सल सेवा अतिशय परवडणाऱ्या दरात पाठवता येईल. ३०० ग्रॅम वजनाच्या पॅकेटसाठी फक्त २०  रुपयांपासून पाच किलोग्रॅमपर्यंतच्या पाकिटासाठी जास्तीतजास्त १०० रुपयांपर्यंत (कर वगळता) याचा दर असेल. फक्त व्यावसायिक नसलेले शैक्षणिक साहित्यच ‘ज्ञान पोस्ट’अंतर्गत पाठवण्यासाठी पात्र असेल. ‘ज्ञान पोस्ट’ सेवा भारतातल्या सर्व विभागीय टपाल कार्यालयांमध्ये १ मे २०२५पासून कार्यान्वित होईल. अधिक माहितीसाठी जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content