Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या मंजुषा पाटील यांच्या गायनाचा!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, ११ ऑगस्टला विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव तर संवादिनीवर सुयोग कुंडलकर साथ देणार आहेत.

मंजुषा पाटील ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले. त्यांनी १९९८ तसेच २००३मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात, बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, धारवाड येथील ‘उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव’ अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. भारतात अनेक ठिकाणी तसेच शिकागो, लंडन, सिंगापूर, मस्कत या देशांतही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. त्यांना पंडित जसराज गौरव, माणिक वर्मा, गुरुवर्य बी. एस. उपाध्ये स्मृती, संगीत शिरोमणी, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि कुमार गंधर्व पुरस्कार मिळाले आहेत.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content