Homeमुंबई स्पेशलमुंबईत ईदची सुट्टी...

मुंबईत ईदची सुट्टी १८ तारखेला!

राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवार, १६ सप्टेंबरऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद, हा मुस्लिमधर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी, हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरला ईदची शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुस्लिमधर्मियांनी केली होती.

या मागणीचा विचार करून शासनाने मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी जाहीर केली आहे. तशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिमधर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content