Homeचिट चॅटडॉ. उज्ज्वला जाधव...

डॉ. उज्ज्वला जाधव दिल्लीच्या राजकारणात!

मुंबईत आपले कर्तृत्त्व गाजविणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबादच्या रणरागिणी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांची भारतीय जनता पक्ष अनुसूचित मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उच्च विद्याविभूषित अशा डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून यापूर्वी कार्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षबांधणी करता करता डॉ. प्रा. जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त करुन भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे पक्षाने कोणतीही विशेष जबाबदारी सोपविली नव्हती.

पण, धीरज का फल मीठा होता है, या न्यायाने त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. परिणामी, भाजपने आता डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांच्या कार्यकर्तृत्त्वाला साजेशी राष्ट्रीय पातळीवर अनुसूचित मोर्चाच्या कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक केल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या महिलांना विशेषतः मागासवर्गीय बांधव आणि भगिनींना उज्ज्वल भवितव्य प्राप्त करुन देण्यासाठी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content