Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी...

मुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियान

शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, १० सप्टेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाला सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.

आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाची माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा ज्यांना लाभ झालाय त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, अशा कुटुंबांचीदेखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. उद्या मुख्यमंत्री लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचे ॲप लाँच होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या अभियानामुळे त्याला लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

या कुटूंब भेटीत काही मागायला नाही तर जनतेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या धोरणांनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीला ३० सप्टेंबर २०२४पर्यंत मुदवाढ दिली आहे. या योजनेचे अनेकांनी चांगले अनुभव सांगितले. बहिणींना खऱ्या अर्थाने मदतीचा हात देणारी ही योजना आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेत अर्ज केले. त्यापैकी १ कोटी ६९ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण कुंटुंबासाठी कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या. अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात मोठी शक्ती महिला आहे. घराचे बजेट चालवणारी महिला असून तिच्या हाती येणारे पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेत येणार आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर त्याचा देशाला फायदा होईल. महाराष्ट्र आज उद्योग, इन्फ्रा, कृषी, गुंतवणूक या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी शासन आपल्या दारी, या योजनेत राज्यातील ५ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख रुपये इतकी वाढवली. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Continue reading

१८व्या ‘जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले’ मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १८व्या "जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले" मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा मंदीर, वडाळा, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झाल्या. ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील वयोगटात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर विविध महापालिकेत महापौराच्या निवडीकडे लक्ष देण्याचे सोडून, मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री...

मुंबईत भाजपाला मिळाली सुमारे २२ टक्के मते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण ११,७९,२७३ मते प्राप्त केली. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपाच्या मतांचा वाटा २१.५८ टक्के असून, विजयी...
Skip to content