आपल्याला थोडं जरी डोकं दुखलं, अंगदुखी जाणवली किंवा ताप आला की आपण लगेच घरच्या कपाटातील किंवा जवळच्या मेडिकल स्टोअरमधून एखादी 'पेनकिलर' घेतो. ही औषधं तात्पुरता आराम देत असली तरी, त्यांचा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीचे सेवन जीवघेणे ठरू शकते. एका नवीन जागतिक संशोधनानुसार, जगात सर्वाधिक वापरली जाणारी काही वेदनाशामक औषधे 'ड्रग पॉयझनिंग' म्हणजेच औषध विषबाधेचा धोका वाढवत असल्याचे समोर आले आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय आरोग्य नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, पॅरासिटामॉल आणि विशेषतः 'मॉडिफाईड-रिलीज' प्रकारच्या वेदनाशामक गोळ्यांमुळे विषबाधेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
हळूहळू परिणाम करणाऱ्या गोळ्या: या गोळ्या शरीरात हळूहळू विरघळतात. जर एखाद्याने चुकून...
मृग बहरात द्राक्ष क, संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली असून त्याचबरोबर मोसंबी, चिकूसाठी 30 जून, डाळिंबाकरीता 14 जुलै तर...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपला १६वा अॅनिव्हर्सरी सेल सुरु केला असून त्यात प्रवास सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठ्या सूटचा समावेश...
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२४मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेसाठी...
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज सी. पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जनरल पांडे 31 मेऐवजी 30 जून...
भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी पेटीएमने आता यूपीआय लाइट वॉलेटवर लक्ष केंद्रित केले आहे. कमी मूल्याच्या दैनंदिन पेमेंट्ससाठी वॉलेटला पसंती देणाऱ्या...
उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (डीपीआयआयटी) वतीने काल नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे ओएनडीसी, अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स स्टार्टअप महोत्सवाचे आयोजन केले...
देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे. कामगारशक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगारहिताचे कायदे केले, कामगारांना संरक्षण...
भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जहाजे, दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा...
राज्यातील पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व्हावा आणि परदेशी पर्यटकांची संख्या वाढावी, याउद्देशाने जयपूर येथे ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारचे (जीआयटीबी) नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचीही भागीदारी होती.
राजस्थान सरकारचा पर्यटन विभाग आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियनचेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने जीआयटीबीचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिका, कॅनडा, युरोपीय देश ब्रिटन, स्पेन, जर्मनी, पोलंड, रशिया, फ्रान्स, इटली आणि व्हिएतनाम, फिलिपाईन्स, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस यासारख्या आग्नेय देशांमधील विविध भागधारकांसमवेत बी टू बी (बिझनेस २ बिझनेस) बैठकांमध्ये त्यांनी त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि मोहक लँडस्केप तसेच पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांची माहिती दिली.
ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश टुरिझमने ग्वाल्हेर आणि मांडूच्या भव्य किल्ल्यांपासून भोपाळच्या शांत तलावांपर्यंत आणि कान्हा आणि बांधवगडच्या घनदाट जंगलांपर्यंत आपला समृद्ध वारसा दाखवला. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बिदिशा मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेश पर्यटन शिष्टमंडळाने ट्रॅव्हल उद्योग व्यावसायिक, टूर ऑपरेटर आणि अभ्यागतांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील अद्वितीय आकर्षणे आणि अनुभवात्मक पर्यटनसंधींची माहिती दिली. संवाद सत्रे आणि सादरीकरणाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील सांस्कृतिक वारसा, वन्यजीव अभयारण्य, तीर्थक्षेत्रे आणि साहसी पर्यटनातील कामगिरी, इव्हेंट्स आणि साहस पर्यटनाची माहिती देण्यात आली.
मुखर्जी यांनी परदेशी पर्यटकांना रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन अंतर्गत मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित पर्यटनाची आणि राज्यातील ओरछा, खजुराहो, चंदेरी, महेश्वर आणि मांडू हे 'वेडिंग डेस्टिनेशन'चे प्रमुख ठिकाण बनविण्यासाठी मंडळाच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावर्षी ३० ऑगस्ट ते...