Homeबॅक पेजदारू पिऊन धिंगाणा...

दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

नाशिकच्या गंगापूर रोडवर काल मध्यरात्री भररस्त्यात धिंगाणा घालत पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या युवक, युवतीवर गंगापूर पोलिसांनी अखेर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या युवकांवर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या संबंधित व्हिडीओमुळे पोलिसांची प्रतिमा मालिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे. त्यांच्याजागी जगवेन्द्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ एक क्लबमधून नाईट पार्टी करून दारूच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्तीपथक दाखल झाले. यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली. या युवतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली. मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली. तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर साळवे (30) रा. पवन नगर, सिडको, वैशाली वाघमारे, नाशिकरोड, भूमी ठाकूर (19) भाभा नगर, आलटमश शेख, वडाळा गाव, दोन बाऊन्सर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित हॉटेल चालकावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content