Homeन्यूज अँड व्ह्यूजमहायुती असो वा...

महायुती असो वा मविआ, चिपळूण मात्र विकासापासून दूरच

सध्या राज्यात सर्वत्र जिल्हापरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम जोरशोरसे वाजत आहेत. सत्तारूढ महायुती व विरोधक असलेली महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. काही कामानिमित्त चिपळूण, गुहागर व दाभोळ परिसरात जाण्याचा योग आला. जी स्थिती राज्यातील महापालिकांची आहे त्यापेक्षा कितीतरीपट गंभीर स्तिती तालुका पातळीवर नागरी सुविधांबाबत पाहवयास मिळाली. गेली सुमारे दहा वर्षे चिपळूण नगरपरिषद अस्तित्त्वातच नव्हती तरी प्रशासन कार्यरत होते. लोकप्रतिनिधी नसताना प्रशासन काय लायकीचे काम करते हे गेली काही वर्षे चिपळूणची जनता अनुभवत असल्याचे अनेकांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांची तर दुरवस्था आहेच, पण नगरपरिषदेने स्वतः बांधलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील रस्त्यांचीही धुळधाण झाली आहे. सांस्कृतिक केंद्र प्रांगणातील रस्ता तर केवळ केविलवाणाच दिसत आहे. खरंतर हा रस्ता नाहीच, ओबडधोबड खडीचा कुठल्यातरी दूरवर असलेल्या दुर्गम गावातील रस्त्यासारखा हा दिसत आहें. हे प्रांगण गेले दहा-बारा वर्षे याच स्थितीत असल्याची संतापजनक माहिती येथील नागरिकांनी सांगितली. यापेक्षाही संतापजनक गोष्ट म्हणजे या प्रांगणाशेजारीच आज संध्याकाळी महायुतीचे ज्येष्ठ नेते चिपळूण शहराच्या विकासाच्या ‘आणभाका’ घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत असूनही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातील रस्त्यांची जर दुर्दशा दिसत असेल तर ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत विचारच करायला नको!

Continue reading

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...

आग्रीपाड्यातली ‘यास्मिन’ आणि पोलिसांचे ‘डोला रे डोला…’!

बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात 'आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त', अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि गेलोही! आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या दारातच उतरलो. आजूबाजूला नजर टाकली. प्रशस्त रस्ता, गगनचुंबी इमारती.. काही इमारती तर...
Skip to content