Homeडेली पल्सशेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी...

शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी भाई चव्हाण यांची निवड

राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. १५ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा हा एकूण १४ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी ६ गटांमध्ये राज्यातील एकूण १८० शेतकऱ्यांची निवड झाली होती. यापैकी युरोप दौऱ्याकरीता राज्यातील ५५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्पैयाकी ४१ शेतकऱ्यांनी स्वारस्य दाखविले. युरोप व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ४१ शेतकऱ्यांची अंतिम निवड झाली आहे.

या दौऱ्यामध्ये युरोप समुहातील फ्रान्स, स्विझर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांतील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फलोत्पादन, दुग्धोत्पादन, बीज पक्रिया आदींशी संबंधित मान्यवर विद्यापीठांना भेटी देऊन माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागाने या परदेशी दौऱ्यातील ज्ञानाचा उपयोग संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना करुन देण्याच्या उद्देशाने ६ परदेशी गटांमधून या दौऱ्याची आखणी केली आहे. या दौऱ्यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण ५ शेतकऱ्यांची वेगवेगळ्या गटांतून निवड झाली आहे. यापैकी काही शेतकरी गट या अभ्यासदौऱ्यासाठी यापूर्वीच रवाना झाले आहेत.

युरोप अभ्यासदौऱ्यासाठी कोकणातील ८ शेतकरी

या युरोप दौऱ्यासाठी ठाणे येथील गुरुनाथ कांबळे, बबन हरणे, विष्णू म्हात्रे, पालघर येथील वैजनाथ पाटील, रायगड येथील सुरेंद्र विचारे, नुपूर भापकर, रत्नागिरी येथील मधुरा इनामदार आणि सिंधुदुर्गातील गणपत चव्हाण असे कोकणातील ८ शेतकरी रवाना होत आहेत.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content