Homeचिट चॅटयेत्या १७ एप्रिलपासून...

येत्या १७ एप्रिलपासून बोरिवलीत रंगणार ‘अजिंक्यतारा’ मल्लखांब स्पर्धा

मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर (एक्सर सुविद्या शाळा), एक्सर रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे मल्लखांबातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांना समर्पित “अजिंक्यतारा चषक” मल्लखांब स्पर्धा सलग ५व्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे.

त्याचबरोबर सु. प्र. संघाचे अध्यक्ष व कर्ममूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे अमृतमहोत्सवी वर्षदेखील साजरे करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील ५० संस्थांमधून ९००पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ६/८/१०/१२/१४/१६/१८ वर्षांखालील मुले आणि मुली असे खेळाडूंचे वयोगट आहेत. मल्लखांब खेळातील एकमेव पॅरा मल्लखांब वयोगटातील स्पर्धादेखील‌ यावेळी‌ घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूस अजिंक्यतारा पदक, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येईल. तसेच प्रत्येक वयोगटात वैयक्तिक पदकं, सांघिक चषक अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सुविद्या प्रसारक संघाचे सचिव मिलिंद जोशी, स्पर्धा सचिव संचिता देवल, आशिष देवल व दुदम सरांचे विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबई उपनगरातील ही भव्य स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेच्या आधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख आशिष देवल यांच्याशी ९६६४००२०५१ क्रमांकावर संपर्क साधावा.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content