HomeArchive'गार्डन रिच'कडून शंभरावी...

‘गार्डन रिच’कडून शंभरावी युद्धनौका राष्ट्राला अर्पण!

Details
‘गार्डन रिच’कडून शंभरावी युद्धनौका राष्ट्राला अर्पण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भारतीय नौदलाच्या ताफ्यात जमिनीवर किंवा जमिनीवरील शस्त्रसामग्री,मनुष्यबळ वाहून नेणारी उपयुक्त नौका समारंभपूर्वक दाखल झाली. व्हाईस ऍडमिरल पूर्व नौदल प्रमुख अतुलकुमार जैन यांनी तिला सहभागी करून घेतले. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात भारतीय गोदीतील हा बहुमानाचा क्षण होता. या प्रकारची ही सहावी बोट आहे. शंभरावी युद्ध बोट बांधण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल कोलकात्याच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर या केंद्र शासनाच्या उपक्रमाचं जैन यांनी अभिनंदन केले.

सदर बोटीच्या ताफ्यात सामील होण्याचं वॉरंट बोटप्रमुख ले. कमांडर गोपीनाथ नारायणन यांनी वाचून दाखवलं. त्याचवेळी नौदल झेंडा राष्ट्रध्वजाच्या सुरावटीने दिमाखात फडकवला गेला. हिची तैनाती पोर्ट ब्लेअर येथे असेल. या बोटीच्या सामील होण्याने सागरी आणि मानवी मदत, आपत्ती निवारणाच्या कामात उपयोगी कामगिरी बजावली जाईल. शोध नि बचाव कार्य, किनारा अभियान, शोध मोहीम, तटीय गस्त, निरीक्षण कामगिरी अशासाठी हिचा वापर होईल. त्यामुळेच तिला ‘मल्टी रोल’ म्हंटलं जातं. अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात हिचा वापर केला जाईल. गार्डन रिचचे व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल व्ही. के. सक्सेना, कमोडोर आशुतोष रिधोरकर इतर अधिकारी उपस्थित होते.

भारतीय नौदलाच्या मागणी नि गरजेनुसार या L C U MARK IV बोटीची बांधणी गार्डन रिचच्या अंतर्गत तंत्रज्ञानी केली. नियोजित कार्यक्रमानुसार पुढील दोन बोटींची बांधणी – प्रगती सुरू असल्याचे या कंपनीने स्पष्ट केलंय. या बोटीमुळे सैन्यसामग्री वहन, रणगाडे, चिलखती सामान किनाऱ्यावर उतरवणं सोपं होणार आहे. इंटिग्रेटेड ब्रिज नि प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीममुळे यात अधिकची सुलभता येईल. ही बोट ६३ मीटर लांब, ११ मीटर रुंद, ८३० टनाची असून १.७ मीटर इतक्या ओहोटीपर्यंत तरंगू शकते. या बोटीवर दोन MTU डिझेल इंजिन बसवली असून त्याद्वारे बोट १५ नॉटिकल मैल गती घेऊ शकते. मेडक आयुध निर्माण कारखान्यात तयार झालेल्या दोन ३० मिमीच्या CRN 91 बंदुका सज्ज आहेत. चार अधिकारी नि ५६ नाविक असा ताफा तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दीडशे जणांचं पथकही नेता येतं.

 

अशाप्रकारची LCU L-51 भारतीय नौदलात मार्च २०१७ साली दाखल झाली. भविष्यातील ५०० कंपन्यांमध्ये सामील झालेल्या GRSE ने पहिली भारतीय बनावटीची युद्धनौका १९६१ साली ‘भा नौ पो अजय’ ची (INS)बांधणी केली. गेल्या साठ वर्षांत आतापर्यंत बांधणी केलेल्या ७८० विविध बोटीं उभारल्या. त्यात १०० पैकी ६७ भारतीय नौदलासाठी तयार झाल्या तर उर्वरित भारतीय तट रक्षक दल, नि मॉरिशस देश यांना दिल्या गेल्या. या ६७ मध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पाणबुडी विरोधी ASW, उथळ पाण्यावरील बोटी, फ्रिगेट्स, मिसाईल कॉर्व्हेट, ASW कॉर्व्हेट्स, टँकर्स, पाहणी बोट, पेट्रोल वेसल्स, फास्ट अटॅक क्राफ्ट अशा निरनिराळ्या प्रकारच्या बोटींचा यात समावेश आहे.

मागील काळात पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी GRSE ने ६०५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून एकाचवेळी २० बोटी बांधण्याची क्षमता आहे. सध्या GRSE कडे २७ हजार ५०० कोटी रूपयांची ऑर्डर आहे. त्यातून मोठी महसूल वृद्धी होईल. बांधणीच्या विविध टप्प्यावर २० जहाजे असून पूर्ण झाल्यावर ती नौदल नि तटरक्षक दलाला सुपूर्द करण्यात येतील असं यावेळी सांगितले गेले. अशीच भरीव कामगिरी सर्वच क्षेत्रात घडत भारत प्रगतीच्या मार्गावर चालत राहो अशा शुभेच्छा द्यायलाच हव्यात नाही का? जय हिंद!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भारतीय नौदलाच्या ताफ्यात जमिनीवर किंवा जमिनीवरील शस्त्रसामग्री,मनुष्यबळ वाहून नेणारी उपयुक्त नौका समारंभपूर्वक दाखल झाली. व्हाईस ऍडमिरल पूर्व नौदल प्रमुख अतुलकुमार जैन यांनी तिला सहभागी करून घेतले. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात भारतीय गोदीतील हा बहुमानाचा क्षण होता. या प्रकारची ही सहावी बोट आहे. शंभरावी युद्ध बोट बांधण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल कोलकात्याच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर या केंद्र शासनाच्या उपक्रमाचं जैन यांनी अभिनंदन केले.

सदर बोटीच्या ताफ्यात सामील होण्याचं वॉरंट बोटप्रमुख ले. कमांडर गोपीनाथ नारायणन यांनी वाचून दाखवलं. त्याचवेळी नौदल झेंडा राष्ट्रध्वजाच्या सुरावटीने दिमाखात फडकवला गेला. हिची तैनाती पोर्ट ब्लेअर येथे असेल. या बोटीच्या सामील होण्याने सागरी आणि मानवी मदत, आपत्ती निवारणाच्या कामात उपयोगी कामगिरी बजावली जाईल. शोध नि बचाव कार्य, किनारा अभियान, शोध मोहीम, तटीय गस्त, निरीक्षण कामगिरी अशासाठी हिचा वापर होईल. त्यामुळेच तिला ‘मल्टी रोल’ म्हंटलं जातं. अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात हिचा वापर केला जाईल. गार्डन रिचचे व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल व्ही. के. सक्सेना, कमोडोर आशुतोष रिधोरकर इतर अधिकारी उपस्थित होते.

भारतीय नौदलाच्या मागणी नि गरजेनुसार या L C U MARK IV बोटीची बांधणी गार्डन रिचच्या अंतर्गत तंत्रज्ञानी केली. नियोजित कार्यक्रमानुसार पुढील दोन बोटींची बांधणी – प्रगती सुरू असल्याचे या कंपनीने स्पष्ट केलंय. या बोटीमुळे सैन्यसामग्री वहन, रणगाडे, चिलखती सामान किनाऱ्यावर उतरवणं सोपं होणार आहे. इंटिग्रेटेड ब्रिज नि प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीममुळे यात अधिकची सुलभता येईल. ही बोट ६३ मीटर लांब, ११ मीटर रुंद, ८३० टनाची असून १.७ मीटर इतक्या ओहोटीपर्यंत तरंगू शकते. या बोटीवर दोन MTU डिझेल इंजिन बसवली असून त्याद्वारे बोट १५ नॉटिकल मैल गती घेऊ शकते. मेडक आयुध निर्माण कारखान्यात तयार झालेल्या दोन ३० मिमीच्या CRN 91 बंदुका सज्ज आहेत. चार अधिकारी नि ५६ नाविक असा ताफा तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दीडशे जणांचं पथकही नेता येतं.

 

अशाप्रकारची LCU L-51 भारतीय नौदलात मार्च २०१७ साली दाखल झाली. भविष्यातील ५०० कंपन्यांमध्ये सामील झालेल्या GRSE ने पहिली भारतीय बनावटीची युद्धनौका १९६१ साली ‘भा नौ पो अजय’ ची (INS)बांधणी केली. गेल्या साठ वर्षांत आतापर्यंत बांधणी केलेल्या ७८० विविध बोटीं उभारल्या. त्यात १०० पैकी ६७ भारतीय नौदलासाठी तयार झाल्या तर उर्वरित भारतीय तट रक्षक दल, नि मॉरिशस देश यांना दिल्या गेल्या. या ६७ मध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पाणबुडी विरोधी ASW, उथळ पाण्यावरील बोटी, फ्रिगेट्स, मिसाईल कॉर्व्हेट, ASW कॉर्व्हेट्स, टँकर्स, पाहणी बोट, पेट्रोल वेसल्स, फास्ट अटॅक क्राफ्ट अशा निरनिराळ्या प्रकारच्या बोटींचा यात समावेश आहे.

मागील काळात पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी GRSE ने ६०५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून एकाचवेळी २० बोटी बांधण्याची क्षमता आहे. सध्या GRSE कडे २७ हजार ५०० कोटी रूपयांची ऑर्डर आहे. त्यातून मोठी महसूल वृद्धी होईल. बांधणीच्या विविध टप्प्यावर २० जहाजे असून पूर्ण झाल्यावर ती नौदल नि तटरक्षक दलाला सुपूर्द करण्यात येतील असं यावेळी सांगितले गेले. अशीच भरीव कामगिरी सर्वच क्षेत्रात घडत भारत प्रगतीच्या मार्गावर चालत राहो अशा शुभेच्छा द्यायलाच हव्यात नाही का? जय हिंद!”
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content