HomeArchiveआदित्य ठाकरेंनी साधला...

आदित्य ठाकरेंनी साधला ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद

Details
आदित्य ठाकरेंनी साधला ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबईकर पुन्हा एकदा महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी ते गुरूवारी ईशान्य मुंबईत आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असून मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघातही भगव्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

 

भांडूप येथील शिवसेनेच्या दोन शाखांना भेटी देत अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटकही त्यांच्यासोबत होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वाखालील मजबूत सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपण राज्यभर फिरलो असता, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असल्याचे ते म्हणाले. शिवाय फक्त ईशान्य मुंबईतच नव्हे तर मुंबईतील सर्व मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले.

 

मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, मनोज कोटक यांचे महापालिकेतील कामआपण स्वत: पाहिले आहे. मुंबईशी संबंधीत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर कोटक यांची भूमिका मला नेहमीच भावलेली आहे. त्यामुळे मी स्वत: फोन करून त्यांना प्रचारासाठी येत असल्याचे सांगितले. ते फक्त महायुतीचे उमेदवार नाहीत, तर मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे आपले दिल्लीतील प्रतिनिधी असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

मनोज कोटक यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे सांगितले. गेला महिनाभर आम्ही सर्वजण महायुतीचा प्रचार करत आहोत. आता शेवटच्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी अशा पद्धतीने शाखेवर जाऊन गाठीभेटी घेतल्याने कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते इथे आल्याचे कोटक यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबईकर पुन्हा एकदा महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी ते गुरूवारी ईशान्य मुंबईत आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असून मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघातही भगव्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

 

भांडूप येथील शिवसेनेच्या दोन शाखांना भेटी देत अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटकही त्यांच्यासोबत होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वाखालील मजबूत सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपण राज्यभर फिरलो असता, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असल्याचे ते म्हणाले. शिवाय फक्त ईशान्य मुंबईतच नव्हे तर मुंबईतील सर्व मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले.

 

मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, मनोज कोटक यांचे महापालिकेतील कामआपण स्वत: पाहिले आहे. मुंबईशी संबंधीत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर कोटक यांची भूमिका मला नेहमीच भावलेली आहे. त्यामुळे मी स्वत: फोन करून त्यांना प्रचारासाठी येत असल्याचे सांगितले. ते फक्त महायुतीचे उमेदवार नाहीत, तर मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे आपले दिल्लीतील प्रतिनिधी असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

मनोज कोटक यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे सांगितले. गेला महिनाभर आम्ही सर्वजण महायुतीचा प्रचार करत आहोत. आता शेवटच्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी अशा पद्धतीने शाखेवर जाऊन गाठीभेटी घेतल्याने कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते इथे आल्याचे कोटक यांनी सांगितले.”
 
 
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content