Homeकल्चर +उद्धव ठाकरे करणार...

उद्धव ठाकरे करणार रजनीश काकडेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई प्रेस क्लबने त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाजवळच्या वास्तूत दिवंगत ज्येष्ठ छायाचित्र-पत्रकार रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ८ मेपासून आयोजित केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर साधारण महिनाभर हे प्रदर्शन सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहील, असे प्रेस क्लबच्या सूत्रांनी सांगितले.

साधारण दोन-अडीच महिन्यांपूर्वी रजनीश काकडे यांचे निधन झाले. वय अवघे ५५ वर्षे. हे वय होत का जाण्याचं? नाही. पण नियतीला काय माहित की त्याच्या हातून अजून कुणाकुणाचे फोटो कुठल्या परिस्थितीत काढायचे आहेत ते! फोटोलाच गुंगारा देऊन (तसा तो सर्वांनाच गुंगारा देत मस्त फोटो शोधत असायचा नेहमीच!) तो दिवस सुरु व्हायच्या आधीच अंतर्धान पावला होता. रजनीश यकृताच्या विकाराने बेजार होता. रुग्णालयात दाखल केले होते. घरीच औषधे व उपचार करा, असे सांगून डिस्चार्ज मिळाला होता. तब्येत सुधारत होती. स्थिर होती. अचानक हार्टअटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. धडपडीचा तसेच चपळाईचा क्षण थप्प झाला. रजनीश कायमचा निघून गेला..

वर्तमानपत्र वा वृत्त विभागाला कोणत्या प्रकारचा फोटो लागतो याची जाण रजनीशला उपजतच होती. या जाणीवेपोटीच तो जिवन्त फोटोसाठी काही तास बैठक मारून बसत वा उभा राहत असे. उभा राहिला तर सतत जागा बदलत असे. मनाजोगा ‘अँगल’ मिळत नसे तोवर तो सैरभैर होत असे. २६/११ मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याची नजर ताजमहाल हॉटेलवरून कित्येक तास हलली नव्हती हे त्याच्या यशस्वीतेचे गमक आहे. हे सर्व फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते हे सांगायला नकोच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले!

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा संबंधांवरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे....

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...
Skip to content