Homeकल्चर +'वंदे मातरम'वर आधारित...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “व्हीएम फ्रेम्स” या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने व्यक्त करावयाचा आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला गेल्या वर्षी 150 वर्षे पूर्ण झाली. हा महत्वाचा टप्पा वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाद्वारे साजरा केला जात आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जाणीवेत एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मातृभूमीला ‘दैवी स्त्रीशक्ती’ मानत, या गीताने दिलेला संदेश स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि आजही तो राष्ट्रभावनेतून उमटत आहे.

व्हीएम फ्रेम्स

‘व्हीएम फ्रेम्स’ चित्रपट निर्माते, कलाकार आणि नागरिकांना ‘वंदे मातरम’च्या तत्त्वज्ञानाचा समकालीन स्वरूपात पुनर्विचार करायचा आहे. ही स्पर्धा तीन श्रेणींमध्ये खुली आहे:

  • रील्स
  • एआय-आधारित चित्रपट
  • लघुपट

सहभागींना देशभक्ती, सांस्कृतिक ओळख, एकता आणि प्रगत ‘नव्या भारता’च्या दृष्टीकोनावर आधारित संकल्पनांवर व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

पुरस्कार आणि मान्यता

रील्स

  • प्रथम पारितोषिक: ₹ 1,50,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 1,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 50,000

एआय चित्रपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 5,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹3,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 1,50,000

लघुपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 15,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 12,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 10,00,000

सहभागासाठी तपशील

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 7 मे 2026
  • अधिक माहिती: vande mataram150.in 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...
Skip to content