Homeकल्चर +‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ साधण्यात आला आहे. या चित्रपटाचे सूत्र काळाचा प्रवास असे आहे.

‘अच्चप्पास् अल्बम’ चित्रपटाचे दिग्दर्शन दीप्ती पिल्लाई सेल्वन यांनी केले असून कथा-पटकथा संजीव सिवन, अनिर्बन भट्टाचार्य आणि उमेश नायर यांची आहे. या कथेत भूतकाळात जाण्याची वैश्विक कल्पना मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे कथानक वडील आणि मुलाभोवती फिरणारे असून एका योगायोगाने हे दोघेजण एकमेकांचे आयुष्य जगू लागतात. दोघांच्या आयुष्याची ही अदलाबदल, दोन पिढ्यांमधील जाणीवा आणि आयुष्यातील त्यांच्या आवडीनिवडीच्या पार्श्वभूमीवर विनोदी आणि भावनिक पातळीवर उलगडत जाते. या चित्रपटात अनेक प्रतिष्ठित कलावंतांच्या भूमिका आहेत. त्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अंजना अप्पुकूट्टन, आदिनाथ कोठारे, प्रियांका नायर आणि सिद्धार्थ सिवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक अंगाची जबाबदारी प्रतिष्ठित तंत्रज्ञांनी उचलली आहे. छायाचित्रण मनोज पिल्लई यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक श्रीकर प्रसाद यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. संगीत संयोजन गुलजार सिंग यांचे आहे.

या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक दीप्ती सिवन म्हणाल्या की, या चित्रपटामध्ये मानवी नातेसंबंध एका काळाच्या प्रवासासोबत उलगडण्यात आलेले आहेत. एनएफडीसीचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदुम म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय सिनेमांमधील विशेष सादरीकरणाला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण प्रतिबिंबित होत आहे. एक कल्पनारम्य कथा आणि भावनिक खोली असलेला ‘अच्चप्पास् अल्बम’ सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आपलेसे करण्याची क्षमता असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या एनएफडीसीच्या समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. हा ट्रेलर तुम्ही https://www.youtube.com/watch?v=G6WDgZNA5u8 या संकेतस्थळावरही पाहू शकता.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content