Homeटॉप स्टोरीआता फक्त २००...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मोजणी प्रक्रियेतील प्रशासकीय विलंब आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी आता ‘नियमित मोजणी’ ९० दिवसांत आणि ‘द्रूतगती मोजणी’ केवळ ३० दिवसांत पूर्ण करणे महसूल विभागासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

या नव्या धोरणात ग्रामीण आणि शहरी भागांसाठी मोजणीचे सुस्पष्ट दर आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २ हजार रुपये (द्रूतगतीसाठी ८ हजार रुपये), तर शहरी भागात १ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी ३ हजार रुपये (द्रूतगतीसाठी १२ हजार रुपये) शुल्क आकारले जाईल. मोजणीच्या दिवशी अर्जदार गैरहजर राहिल्यास त्याला मूळ फीच्या ५० टक्के किंवा कमाल १० हजार रुपयांपर्यंत ‘पुनर्भेट शुल्क’ (दंड) आकारला जाईल; मात्र भूमापक अधिकारी गैरहजर राहिल्यास अर्जदाराला कोणताही दंड लागणार नाही. यासोबतच निमशासकीय आणि सरकारी संस्थांना मोजणी दरात ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार असून, गुंठेवारी अधिनियमांतर्गत येणाऱ्या भूखंडांसाठी दीडपट शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

नद्या आणि नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देणार

महसूल विभागातर्फे सर्वसामान्यांच्या जमिनीच्या प्रश्नांवर निर्णय घेतानाच, राज्याच्या जलसंवर्धनासाठीही मंत्री बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील नद्या आणि नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी राज्यशासन लवकरच एक स्वतंत्र आणि नवीन योजना आणणार आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील नद्या-नाल्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे भूजल पातळी, सिंचन आणि पूरनियंत्रणावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी तातडीने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विविध प्रशासकीय विभागांच्या मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी या कामांचे आवश्यक अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे स्थानिक पातळीवरील जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे आणि वेगाने पूर्ण होतील.

Continue reading

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...

रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर विकास गुप्ते यांचे आज, ६ जुलै २०२६ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगार...

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...
Skip to content