Homeटॉप स्टोरीआता फक्त २००...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मोजणी प्रक्रियेतील प्रशासकीय विलंब आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी आता ‘नियमित मोजणी’ ९० दिवसांत आणि ‘द्रूतगती मोजणी’ केवळ ३० दिवसांत पूर्ण करणे महसूल विभागासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

या नव्या धोरणात ग्रामीण आणि शहरी भागांसाठी मोजणीचे सुस्पष्ट दर आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २ हजार रुपये (द्रूतगतीसाठी ८ हजार रुपये), तर शहरी भागात १ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी ३ हजार रुपये (द्रूतगतीसाठी १२ हजार रुपये) शुल्क आकारले जाईल. मोजणीच्या दिवशी अर्जदार गैरहजर राहिल्यास त्याला मूळ फीच्या ५० टक्के किंवा कमाल १० हजार रुपयांपर्यंत ‘पुनर्भेट शुल्क’ (दंड) आकारला जाईल; मात्र भूमापक अधिकारी गैरहजर राहिल्यास अर्जदाराला कोणताही दंड लागणार नाही. यासोबतच निमशासकीय आणि सरकारी संस्थांना मोजणी दरात ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार असून, गुंठेवारी अधिनियमांतर्गत येणाऱ्या भूखंडांसाठी दीडपट शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

नद्या आणि नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देणार

महसूल विभागातर्फे सर्वसामान्यांच्या जमिनीच्या प्रश्नांवर निर्णय घेतानाच, राज्याच्या जलसंवर्धनासाठीही मंत्री बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील नद्या आणि नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी राज्यशासन लवकरच एक स्वतंत्र आणि नवीन योजना आणणार आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील नद्या-नाल्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे भूजल पातळी, सिंचन आणि पूरनियंत्रणावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी तातडीने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विविध प्रशासकीय विभागांच्या मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी या कामांचे आवश्यक अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे स्थानिक पातळीवरील जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे आणि वेगाने पूर्ण होतील.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content