Homeपब्लिक फिगरकॅबिनेट मंत्रीपद मागितले...

कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर राज्यमंत्रीपदही जाईल…

मी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर मला राज्यमंत्रीपदही सोडावे लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. या वाक्याचे स्पष्टीकरणही लगेचच त्यांनी केले. केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये असलेल्या लहान पक्षांच्या प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांच्या पक्षाचे दोन-चार खासदार निवडून आले आहेत. आमच्या पक्षाचा एकही खासदार नाही, महाराष्ट्रात एकही आमदार नाही. मग कॅबिनेट मंत्रीपद मागू तरी कसे, असे ते म्हणाले.

आमच्या पक्षाचे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे आसाम, मिझोराम, अशा ईशान्य राज्यांमध्येही प्रतिनिधी आहेत. मात्र, ज्या महाराष्ट्रातून मी येतो, राज्यसभेवर निवडून जातो, त्या महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा मुंबईत एकही प्रतिनिधी असू नये, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मित्रपक्षही आम्हाला जागा सोडत नाहीत. त्यांच्या चिन्हावरही उमेदवार देऊ देत नाहीत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागा सोडण्यासाठी तयार होते. त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडे विषय सोपविला. त्यांनी पुढे प्रतिसादच दिला

कॅबिनेट

नाही. आज आमच्या पक्षाचे उमेदवार इतर राज्यांमध्ये निवडून येतात. आता प. बंगाल, तामिळनाडू, केरळ येथेही आम्ही निवडणूक लढवित आहोत. आणखी फक्त दोन राज्यांमध्ये आमचे लोकप्रतिनिधी निवडून आले की आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल. पण, याकरीता मेहनत घ्यावी लागेल. येत्या पाच वर्षांत आपण यादृष्टीने पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले.

तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्याबद्दल त्यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधींबरोबर नुकत्याच अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी बोलताना आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असल्याचे सांगितले. मोदी यांची लोकप्रियता २०१४ साली जशी होती तशीच आताही आहे. त्यांची लोकप्रियता वाढतच आहे. प. बंगालमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जवळजवळ ७० उमेदवार ३-४ हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळी तसे होणार नाही. या निवडणुकीत आम्हीही आमचे काही उमेदवार उभे केले आहेत आणि उर्वरित ठिकाणी भाजपला पूर्णपणे समर्थन दिले आहे, असे आठवले म्हणाले.

1 COMMENT

  1. कुठच्याही सरकार मध्ये आठवले साहेबांची जागा येन केन प्रकारे पक्की होणे हेच त्यांचे एकमेव उद्ददीष्ट!

Comments are closed.

Continue reading

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...
Skip to content