Homeकल्चर +येत्या शनिवार/रविवारी पायात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अंदमानच्या सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर आणि इतर सर्वच क्रांतिकारकांना बैलाच्या जागी कोलूला जुंपले जात असे आणि आठ तासांत तीस पाऊंड म्हणजे साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेलाचे प्रमाण पूर्ण न झाल्यास न थांबता कोलू फिरवावा लागे आणि अमानुष शिक्षाही केल्या जात. या अघोरी छळाला कंटाळून इंदुभूषण राय यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्त्या केल्या. उल्हासकर दत्त यांच्यासारख्या अनेक वीरांचे मानसिक संतुलन ढळले. ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’ हेच आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. पण असंख्य क्रांतिकारकांच्या अपार त्याग आणि बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्याचं हे मोल, क्रांतिकारकांच्या यातना जाणून घेण्याची संधी मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने उपलब्ध केली आहे. भारतमातेच्या सुपुत्रांनी भोगलेल्या असह्य यातनांचा अनुभव राष्ट्रप्रेमी स्वतः कोलू चालवून घेऊ शकतात. यानिमित्ताने भारतातल्या युवा पिढीला खरा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल.

बंदीवानांना ८-८ तास कोलू फिरवावा लागत असला, तरी त्याचा थोडासा अनुभव म्हणून उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना अधिकाधिक १५ मिनिटे कोलू फिरवण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या यातनांचा थोडातरी अनुभव घेता यावा, यासाठी पायात बेड्या घालूनच हा कोलू फिरवायचा आहे. दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शनिवार, ४ आणि रविवार ५ एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा अनोखा उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गूगल फॉर्म भरून वेळेची निश्चिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीविषयी कोणतीही शंका असल्यास ९२२००७०३८६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पायात बेड्या घालायच्या असल्याने फूलपँट / सलवार घालून यावे, जेणेकरून पायाला इजा होणार नाही. गूगल फॉर्मची लिंक- https://forms.gle/SVexjX6RbcNCTJFz6 कोलू फिरवण्याच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्याच दिवशी देण्यात येणार आहे. स्मृती म्हणून कोलू फिरवून निघालेले तेलही उपक्रमानंतर २ दिवसांनंतर सर्वांना देण्यात येईल. स्वातंत्र्याचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...
Skip to content