Homeहेल्थ इज वेल्थबोटाच्या हलक्याशा हालचालीने...

बोटाच्या हलक्याशा हालचालीने झाले उपचार व चालायला लागला रुग्ण!

बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून, आज ते स्वतःच्या पायावर चालत आहेत. वरवडे कामावरून घरी परतत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या मानेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले. या दुखापतीमुळे पाठीच्या कण्यावर प्रचंड दबाव आला आणि त्यांच्या खांद्याखालचा संपूर्ण भाग निकामी झाला. स्थानिक पातळीवर अनेक रुग्णालयांनी ही दुखापत अत्यंत गंभीर असल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. पुढील १५ दिवस ते कोणत्याही ठोस उपचारांशिवाय घरीच होते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला.

या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलशी संपर्क साधला. तेथे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी यांनी व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे तपासणी केली. या तपासणीत शरीर पूर्णतः निष्क्रिय असतानाही डाव्या पायाच्या अंगठ्यात झालेली अतिशय सूक्ष्म हालचाल त्यांनी ओळखली. हीच एक आशेची किरण ठरली. यानंतर वरवडे यांना तातडीने मुंबईत दाखल करण्यात आले. उपचारांमधील विलंबामुळे शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. रुग्णाला आयुष्यभर व्हेंटिलेटरवर राहवे लागू शकते, अशी शक्यता होती. तरीही, कुटुंबियांनी धाडसाने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. कोठारी आणि त्यांच्या टीमने सर्व्हायकल स्पाइन सर्जरी करून पाठीच्या कण्यावरील दबाव कमी केला आणि मणक्याला स्थिरता दिली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यात सकारात्मक बदल दिसू लागले. अवघ्या दोन आठवड्यांत वरवडे आधाराने चालू लागले आणि तीन महिन्यांत ते पूर्णपणे स्वतः चालण्यास सक्षम झाले.

डॉ. मनिष कोठारी म्हणाले की, “या केसमध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी रुग्ण व्हेंटिलेटरवर अवलंबून राहण्याची शक्यता होती. मात्र, आम्ही त्यांना स्वतंत्रपणे श्वास घेता यावा आणि सामान्य आयुष्य जगता यावे, यावर लक्ष केंद्रित केले.” जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके यांनी सांगितले की, “बीडसारख्या भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची गरज असते. अशावेळी टर्शियरी केअर सेंटर्सनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे असते. ही केस आमच्या बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.”

स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना राजीव वरवडे म्हणाले की, “अपघातानंतर सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं. पण जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले आणि आज मी पुन्हा चालू शकतोय. हे माझ्यासाठी नवजीवनच आहे.”

ही केस केवळ एका रुग्णाच्या पुनर्जन्माची कहाणी नसून, बीडसारख्या जिल्ह्यातील रुग्णांनी योग्यवेळी तज्ज्ञउपचार मिळविल्यास अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही आशा निर्माण होऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...

ठाण्याच्या श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १४ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत....

फुकेतमधले ‘दगडूशेट गणपती’ मंदिर ठरतंय पर्यटकांसाठी आकर्षण!

हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील फुकेत हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळापासून व्यापार, समुद्री संपर्क आणि विविध संस्कृतींच्या संगमामुळे फुकेतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बौद्ध...
Skip to content