Homeटॉप स्टोरीमुंबईत भाजपाला मिळाली...

मुंबईत भाजपाला मिळाली सुमारे २२ टक्के मते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण ११,७९,२७३ मते प्राप्त केली. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपाच्या मतांचा वाटा २१.५८ टक्के असून, विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपैकी तब्बल ४५.२२ टक्के मते भाजपाकडे गेली आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहिली. या पक्षाने ६५ जागा जिंकत ७,१७,७३६ मते मिळवली. एकूण मतदानात त्यांचा वाटा १३.१३ टक्के असून विजयी मतांपैकी २७.५२ टक्के मते या पक्षाला मिळाली. शिवसेनेने २९ जागा जिंकत २,७३,३२६ मते मिळवली. मतदानातील त्यांचा एकूण वाटा ५ टक्के असून, विजयी मतांमध्ये त्यांचा हिस्सा १०.४८ टक्के आहे. काँग्रेसने २४ जागांवर यश मिळवत २,४२,६४६ मते मिळवली. काँग्रेसचा एकूण मतदानातील वाटा ४.४४ टक्के तर विजयी मतांमध्ये ९.३१ टक्के आहे. याशिवाय ऑल इंडिया एमआयएम (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) या पक्षाला ८ जागा आणि ६८,०७२ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) ६ जागा आणि ७४,९४६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा आणि २४,६९१ मते, समाजवादी पार्टीला २ जागा आणि १५,१६२ मते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद्चंद्र पवार)ला १ जागा आणि ११,७६० मते प्राप्त झाली.

एकूण २२७ विजयी उमेदवारांना २६,०७,६१२ मते मिळाली असून, हे प्रमाण एकूण मतदानाच्या ४७.७२ टक्के इतके आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण मुंबईत एकूण मतदान ५४,६४,४१२ इतके झाले. ११,६७७ मते बाद ठरली.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content