Homeचिट चॅटबार कौन्सिल ऑफ...

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोव्याच्या अध्यक्षपदी अहमदखान पठाण

अॅड. अहमदखान पठाण यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. बार कॉन्सिलच्या मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अॅड. पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अॅड. पठाण हे बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, या वकिलाच्या शिखर परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. यापूर्वी तीन वेळा त्यांनी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यपदीही ते तीन वेळा निवडून आले आहेत. ते वक्फ मंडळाचे विद्यमान सदस्यही आहेत.

त्यांच्या अध्यक्षपदावरील निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पदाला न्याय देऊन वकिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी प्रतिक्रिया पठाण यांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केली आहे. विधि क्षेत्रातील एक नामवंत शिक्षक म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विधि क्षेत्रात वकील आणि न्यायाधीशपदावर कार्यरत आहेत. अॅड. पठाण पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील बादशहा तलाव येथील आहेत. कुटुंबातील पहिले वकील असलेल्या पठाण यांनी स्वःकर्तृत्वाने हे यश संपादन करून नवीन पिढीसाठी आदर्श निर्माण केला आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content