Homeचिट चॅटसूर्यवंशी क्षत्रिय समाज...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. दोन नोव्हेंबर रोजी दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात, एका दिमागदार सोहळ्यात लिलाव पद्धतीने सहा संघमालकांनी नव्वद खेळाडूंची निवड केली. सूर्यवंशी वॉरियर, सिंबा सिक्सर, इन्स्पायर रॉयल, स्वराज इलेव्हन, आरडी ब्लास्टर आणि प्राइड ऑफ पालघर या संघांनी प्रत्येकी 15 खेळाडूंचा संघ तयार केला.

दीपक पाटील हे या स्पर्धेचे संचालक आहेत. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे अध्यक्ष प्रवीण महाले आणि चिटणीस जयंत पाटील यांचा यात मोलाचा वाटा आहे. या स्पर्धा पोलीस जिमखाना, मरीन लाइन्स येथे खेळवल्या जातील. अंतिम सामना रात्री प्रकाशझोतात खेळवला जाईल. विजेत्या संघास करंडक व एक लाख रुपयाचे बक्षीस तसेच उपविजेत्याला करंडक आणि पन्नास हजारांचे पारितोषिक असेल. इतर अनेक बक्षिसेही यावेळी दिली जाणार आहेत. याचे नियोजन जीआर स्पोर्ट्स यांनी केले आहे. सूर्यवंशी क्षत्रिय समाजातर्फे या क्रिकेट उत्सवाची सांगता 28 नोव्हेंबरला रात्री जल्लोषात केली जाईल, असे संघाचे चिटणीस जयंत पाटील यांनी कळवले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content