Homeन्यूज ॲट अ ग्लांसआंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश...

आंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश फोगटची निवृत्ती मागे?

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट, आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेण्याची शक्यता असून ती आणखी दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे अंतीम सामन्यातून बाद ठरल्यानंतर विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती घोषित केली होती. मात्र, आज तिने एक्सवर एक पोस्ट

ऑलिम्पिक

टाकून ट्विट केले की, माझ्या शरीरात आजही कुस्ती जिवंत आहे आणि २०३२पर्यंत ती कधीही उफाळू शकेल. माझ्यातली कुस्ती जिवंत आहे आणि ती २०३२पर्यंत खेळू शकेल, असे तिने म्हटले आहे. तिच्या याच पोस्टमुळे ती आपल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेऊन पुन्हा नव्या स्पर्धेची तयारी करेल, असे जाणकारांना वाटते.

निवृत्ती जाहीर केल्यानंतरही विनेशने आपण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकेपर्यंत ५० किलो वजनी गटात बसलो होतो, त्यामुळे आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केली होती. मात्र, तिचे अपिल लवादाने फेटाळले. त्यानंतर लगेचच विनेशने, अजून आपल्यातली कुस्ती जिवंत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कुस्तीशौकिनांना विनेश फोगटचा आंतरराष्ट्रीय संग्राम निश्चितच पाहयला मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content