Homeटॉप स्टोरीलोकसभा सभापतीपदी ओम...

लोकसभा सभापतीपदी ओम बिर्ला बिनविरोध?

लोकसभेच्या सभापतीसाठी आज सकाळी ११ वाजता निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. या निवडणुकीत ऐनवेळी विरोधी पक्षांचे म्हणजेच काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे उमेदवार काहीतरी कारण उभे करून माघार घेतील आणि निवडणूक बिनविरोध करतील किंवा विरोधक निवडणुकीवर बहिष्कार घालून निवडणूक एकतर्फी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक झालीच तर ती तब्बल २६ वर्षांनंतर होईल. निवडणूक झाली किंवा नाही एनडीएचे उमेदवार ओम बिर्लाच सभापती होतील, हे निश्चित.

सभापतीपदासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी याकरीता गेले दोन दिवस प्रयत्न सुरू होते. मात्र, लोकसभेच्या उपसभापतीसाठी विरोधकांनी आपला उमेदवार असावा असा हट्ट धरला. सत्ताधाऱ्यांकडून तशी तयारीही दाखवण्यात आली. परंतु विरोधकांनी सरकारी पक्षांवर अविश्वास दाखवत उपसभापतीपदाची निवडणूक आधी घेण्याचा आग्रह धरला जो सत्ताधाऱ्यांकडून धुडकावण्यात आला. पर्यायाने निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न फसला आणि सत्ताधाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य व मावळत्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पुन्हा सभापतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. एनडीएच्या वतीने बिर्ला यांनी काल आपले नामांकनही दाखल केले. त्यापाठोपाठ काँग्रेसकडून के. सुरेश यांनी सभापतीपदाकरीता आपले नामांकन दाखल केले. विरोधी इंडिया आघाडीकडून ते सभापतीपदाचे उमेदवार आहेत.

६१ वर्षीय ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार आहेत. याच भागातून ते २००३ सालापासून २०१४ सालापर्यंत राजस्थान विधानसभेचे भाजपाचे सदस्य होते. के. सुरेश तथा कोडीकुन्निल सुरेश केरळ काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष आहेत. काँग्रेसकडून थिरूवअनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून ते १९८९ ते १९९७ आणि १९९९ ते २००४ या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. आताही ते याच मतदारसंघाचे लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतात.

भाजपाप्रणित एनडीएचे २९३ सदस्य असून काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे २३७ सदस्य आहेत. इतर व अपक्ष असे १३ सदस्य आहेत. लोकसभेत सध्या अपक्षांच्या पाठिंब्यासह सत्ताधारी एनडीएला ३०२ सदस्यांचा पाठिंबा आहे. सभापतीपदासाठी मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधी इंडिया आघाडीची मते फोडण्याचा सत्ताधारी पूर्ण प्रयत्न करेल. यात जर त्यांना यश आले तर या लोकसभेच्या पुढच्या पाच वर्षांत विरोधी आघाडी विस्कळीतच राहील आणि असे चित्र निर्माण होऊ द्यायचे नसेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची.. याप्रमाणे विरोधक ऐनवेळी निवडणूक बिनविरोध करू शकतात, असे जाणकारांना वाटते.

Continue reading

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी होती अशी फुलांची सजावट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल झालेल्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृती स्थळावर विविध फुलझाडांनी तसेच शोभिवंत झाडांनी सजावट केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मांडणी करण्यात आली. यामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाच्या...

ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा झाले ‘जॉली अँड पॉली’!

भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना 'जॉली' आणि 'पॉली' या दोन विशिष्ट भूमिकांमध्ये सादर करण्यात आले आहे,...

‘तिसऱ्या मुंबई’ची दावोसमध्ये मुहूर्तमेढ! रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा!!

मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्या मुंबईतले पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य...
Skip to content