Homeचिट चॅटअसि. पोस्टमास्तर वंदना...

असि. पोस्टमास्तर वंदना पै निवृत्त

असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ द्यावाच, त्याचबरोबर वंदनाताईंनी आपल्यामधील कवी, लेखक जागृत ठेवताठेवता नवसाहित्याची निर्मिती करावी आणि पोस्ट कर्मचारी/ अधिकारी यांच्याबरोबरच समाजाचेही प्रबोधन करावे, असे प्रतिपादन शब्दांत ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी केला.

वंदना पै यांनी केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. याबद्दल त्यांचा बोरीवली पूर्व पोस्ट कार्यालयात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्रिवेदी बोलत होते.

वंदना पै यांनी त्यांच्या कारकिर्दीत बोरिवली पूर्व विभागात अनेक शिबिरांचे आयोजन करून जनतेसाठी उपयोगी असणाऱ्या अनेक बचत योजना सर्वसाधारण जनतेच्या दारापर्यंत पोहोचविल्या. यात खास मुलींसाठी असणारी सुकन्या योजना, सगळ्यात जास्त व्याजदर असणारी पीपीएफ योजना, पंतप्रधान जीवनसुरक्षा योजना तसेच अनेक आधार कॅम्प यांचा समावेश होता. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन नेऊन देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या ऑफिसला अनेकदा उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके मिळवून दिली, असा माहितीपूर्ण गौरवही त्यांनी केला.

त्यांच्या गौरव समारंभास टपाल कामगार युनियनचे या विभागाचे माजी सेक्रेटरी सी. ए. राजपूत, युनियनचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विजय आयरे, कामगार नेते दिलीप कुडतरकर आणि आसपासच्या अनेक टपाल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या ऑफिसमधील असिस्टंट पोस्टमास्तर प्रिया कारकल यांनी भूषविले. वंदना पै यांनी धाडसी, साहसी महिला अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण करतानाच अखिल भारतीय पातळीवर संघटनेतही मोठमोठाली पदे भूषविली. विजय वैद्य यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची आठवण करुन दिली.

या गौरव समारंभात मीनल मोरे, संगीता रावराणे, धूपकर, रामदास चोडणकर, सखाराम तळेकर, प्रभाकर घोरपडे, सुनील पांगे, दिलीप चिंदरकर, बी. जी. चव्हाण, महेंद्र गणाचार्य, कुंडलिक काकडे, सूर्यकांत कदम, सुखदेव लोखंडे, वसंत घडशी आदींनी वंदना पै यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे परिवारजनसुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content