Homeटॉप स्टोरीशरद पवारांबरोबरच्या चर्चेला...

शरद पवारांबरोबरच्या चर्चेला नाना पटोलेंची दांडी!

राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या कुरबुरी मिटविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आजही अपुरे पडले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परंतु, या बैठकीला दोन्ही पक्षातल्या नव्या वादाला तोंड फोडणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच दांडी मारली. दरम्यान, राज्य सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या पटोले यांच्या आरोपाला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पक्षाच्या टिळक भवन येथील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या विविध नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरही बरीच चर्चा झाल्याचे कळते. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या एका पक्ष कार्यकर्त्यांच्या शिबिरात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीतला पेच वाढला होता.

पटोले यांच्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता त्यांनी लहान माणसांच्या वक्तव्यावर आपण भाष्य करत नाही, असे सांगत पटोले यांना उडवून लावले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करताना प्रत्येक सरकार आपल्याला असलेले धोके जाणून घेण्यासाठी यंत्रणा निर्माण करते, असे सांगत पटोले यांच्या आरोपाला अप्रत्यक्ष दुजोराच दिला होता.

आज पाटील यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी पटोले यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे नमूद केले. पटोले यांना केंद्र सरकार आपल्यावर पालत ठेवत असल्याचे सांगायचे होते. परंतु त्यांनी केंद्र असा शब्द वापरला नसल्याने सर्वांनी असा अर्थ काढला, असे पाटील म्हणाले.

आज संध्याकाळी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंळाने शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मंत्रीही यात सहभागी होते. मात्र, पटोले त्यांच्याबरोबर गेले नाहीत. या नेत्यांनी जवळजवळ पाऊण तास पवार यांच्याबरोबर चर्चा केली.

चर्चेनंतर थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी भाष्य केले. सध्याची राजकीय स्थिती, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, केंद्र सरकारने स्थापन केलेले सहकार मंत्रालय, अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली. महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content