Homeचिट चॅटवर्ध्यात राष्ट्रीय युवा...

वर्ध्यात राष्ट्रीय युवा दिवस व सडक सुरक्षा सप्ताह संप्पन्न!

नेहरू युवा केंद्र वर्धा (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार) द्वारा वर्ध्याच्या इंद्रप्रस्थ न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे काल राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, विवेक देशमुख, डॉ. अभिजित वेरुळकर, डॉ. ए. व्ही. ससनकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

युवा

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रामदास तडस यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रवर प्रकाश टाकून त्यांच्याबद्दल युवकांना प्रेरित केले. तसेच रामदास आंबटकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नियमावर चालून युवकांनी त्यांची ध्येय प्राप्त होईपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका असे युवकांना संबोधित केले.

वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्याकडून चंदु खोंडे व रियाज खान यांनी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह बद्दल माहिती देऊन वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे सांगितले.

जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा विजेता वेदांत रोकडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भाषण दिले. सर्व मान्यवरांनी नाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण बघितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन न्यू आर्ट कॉलेजचे प्राध्यापक पेठारे यांनी मानले.

नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोशन सयाम, आकाश मेलेकर, आकाश चौधरी यांनी My Bharat पोर्टल वर युवकांची नोंदणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश इंगोले, शुभम ताकसांडे, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे यांनी परिश्रम घेतले.

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...
Skip to content