Homeचिट चॅटभारतातल्या शेवटच्या गावात...

भारतातल्या शेवटच्या गावात सुरू झाली एटीएम सेवा!

भारतातली आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी स्पाइस मनीने भारतातील सर्वात शेवटचे गाव, हिमाचल प्रदेशातील चितकुलमध्ये आर्थिक सेवा सुरू केल्या आहेत. या गावात आजवर एटीएम सुविधाही नव्हतीआज त्याठिकाणी स्पाइस मनीने मिनी-एटीएम सेवा सुरू केल्या आहेत.

चितकुल गावात फक्त दोन किराणा दुकाने आहेत. त्यापैकी एकाला कंपनीने स्पाइस मनी डिजिटल दुकानबनवले आहे. गावकरी आणि याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या स्पाइस मनी डिजिटल दुकानात कॅश-इन, कॅश-आऊट सेवा मिळतील. आर्थिक समावेश आणि भारतात एटीएम नेटवर्क अधिक सक्षम बनवण्याचे स्पाइस मनीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

शहरी वर्दळीपासून दूरनिवांत हिमाचल प्रदेशातील किन्नौर-कैलास परिसरात हे गाव वसले आहे. एक अतिशय सुरम्य गाव चितकुलयेथील लोकसंख्या जवळपास ९०० असून गावात २०-२५ हॉलिडे रिसॉर्ट्स आहेत. या गावात येणाऱ्या पर्यटकांचा तिथे पाहुणचार केला जातो. चितकुलपासून सर्वात जवळ असलेले एटीएम तब्बल २५ किमी दूर असलेल्या सांगलामध्ये आहे. इंटरनेट कनेक्टिविटी खराब असल्याकारणाने ई-बँकिंग सेवा उपलब्ध होऊ शकत नाहीत.

साहजिकच हे गाव गेली अनेक वर्षे रोख रक्कम आणि अदायगी सेवांच्या उपलब्धतेच्या बाबतीत अनेक आव्हाने झेलत आहे. यामुळे बऱ्याच समस्या उभ्या राहतात आणि गावाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होत आला आहे. स्पाइस मनीने आपल्या डिजिटली सक्षम आर्थिक सेवांसह या समस्येवर तोडगा शोधून काढला. त्यांनी येथील किराणा दुकानाच्या मालकाला स्पाइस मनी अधिकारी बनवूनकोणताही खर्च होऊ न देता त्यांना डिजिटल दुकान सुरू करून दिले आहे.  आता हे डिजिटल दुकान रोख रक्कम काढणे व जमा करणे या पायाभूत सेवा प्रदान करणारे एटीएम केंद्र म्हणून कार्यरत आहे. स्पाइस मनी मिनी-एटीएममध्ये सर्व प्रमुख बँकांची डेबिट व क्रेडिट कार्ड्स स्वीकारली जातात.

स्पाइस मनीचे सीईओ संजीव कुमार यांनी सांगितले कीग्रामीण भारतात रोख अर्थव्यवस्थेवर भर असतो. परंतु एटीएम आणि मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे गावांमध्ये रोख रकमेची खूप कमतरता भासते. स्पाइस मनीमध्ये आमचे उद्दीष्ट आहे कीभारताच्या कानाकोपऱ्यांमधील सर्वात छोट्या गावांना आणि शहरांना सक्षम बनवले जावे आणि त्याठिकाणी एटीएम सेवा सुरू केल्या जाव्यात.

मिनी एटीएम सेवा, अदायगी, पर्यटन व प्रवास सेवा प्रदान करण्यासाठी अधिक जास्त वितरकांना सोबत घेऊन हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये स्पाइस मनी अधिकारी नेटवर्कच्या विस्ताराची योजना कंपनीने आखलेली आहे.  सध्या ५,००,००० पेक्षा जास्त अधिकारी (व्यापारी/व्यावसायिक) स्पाइस मनी नेटवर्कमध्ये सहभागी असून त्यांच्यापैकी जवळपास ९०% हे निम-शहरी व ग्रामीण भारतात आहेत.  या नेटवर्कसोबत स्पाइस मनी भारतात १८,००० पेक्षा जास्त पिन कोड्स, ७०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आणि ५,००० पेक्षा जास्त ब्लॉक्सना सेवा प्रदान करत आहे.

स्पाइस मनी भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी आहे, जिचे ५,००,००० पेक्षा जास्त अधिकारी (व्यावसायिक) रोख रक्कम जमा करणे, आधारमार्फत रोख रक्कम काढणे, मिनी एटीएम, विमा, कर्ज, बिलांची अदायगी, ग्राहक/एजंट्स/एनबीएफसी/बँकांसाठी कॅश कलेक्शन सेंटर, रिचार्ज, पर्यटन व प्रवास, ऑनलाईन खरेदी, पॅन कार्ड व एमपीओएस सेवा प्रदान करतात.  त्यांचे ९०% पेक्षा जास्त नेटवर्क निम-शहरी व ग्रामीण भारतात आहे.  स्पाइस मनी ऍप (अधिकारी ऍप) व वेब पोर्टलमार्फत स्पाइस मनीच्या सेवांचा लाभ घेता येतो.  युजर्सना सहज वापरता येईल असे इंटरफेस आणि उत्तम तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म असलेल्या या ऍपला गूगल प्ले स्टोरवर ४.४ स्टार रेटिंग मिळाले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- https://spicemoney.com

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content