Homeपब्लिक फिगरपंतप्रधान नरेंद्र मोदीः...

पंतप्रधान नरेंद्र मोदीः परचा आणि मास्क!

एरव्ही मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परचा आणि मास्क वापरतात. मात्र, ज्यादिवशी ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले त्याचदिवशी त्यांचा परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.

याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घेतला नाही? ते खरेच भावूक झाले की ठरवून झाले, असा सवाल जनता करत आहे असेही ते म्हणाले. देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला. औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले, असे चित्र निर्माण करण्यात आले असा आरोपही त्यांनी केला. यात खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

नरेंद्र मोदी

मोदी सरकारची सात वर्षे आणि सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

गेल्या सात वर्षांत नोटाबंदी झाली.. जीएसटी लावण्यात आली.. कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही.. लोकांचे हाल झाले.. बेरोजगारी वाढली.. नोकर्‍या गेल्या.. लोकं जीव गमावत आहेत.. तरीही भारतीय जनता पार्टी सरकारची ७ वर्षं साजरी करणार होती. मात्र, जनतेतला रोष ओळखून भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उत्सव साजरा न करण्याचा आदेश काढावा लागला, असा दावाही त्यांनी केला.

२६ मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. या देशात भाजपचे सरकार आहे. मात्र ते मोदी सरकार म्हणून ओळखले जाते. या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे लोक उत्सव साजरा करणार होते. मात्र ऐनवेळी नड्डा यांनी उत्सव साजरा करू नये, असा आदेश काढल्याचे नवाब मलिक म्हणाले.

‘असे’ इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही

नदीमध्ये मृतदेह प्रवाहित करणे.. ऑक्सिजनअभावी लोकं मरत आहेत.. औषधांचा तुटवडा आहे.. देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे.. हे इंडियन मॉडेल कोणच स्वीकारणार नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलचा समाचार घेतला. इंडियन मॉडेल झालेच पाहिजे. परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजपा निर्माण करुन देते, असेही ते म्हणाले.

चांगली कामे करत राहिले पाहिजे. एखादं यश असेल किंवा काम झालं असेल तर निश्चित रुपाने लोकं प्रशंसा करतात. पण अपयशी ठरुनही आम्ही चांगलं काम करतोय, असं भाजपा बोलत राहिली तर लोकं स्वीकारणार नाहीत, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content