Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत...

उद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत कौटुंबिक नाते आहे का?

सांगा उद्धवजी की, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाविरोधात न्यायालयात लढलात की नाहीत? तुमचे तुमच्या वहिनीसोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्ख्या भावाने आरोप केले की नाहीत?, असे सवाल मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केले.

उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. त्यावर पलटवार करताना शेलार म्हणाले की, पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हालाही काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला की नाही? असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, एकेरीत तर अजिबातच बोलू नका. यापुढे पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केलात तर आमचे नेते पण तुमचा अपमान करतील. मग तो सहन करण्याची तयारी ठेवा, असा इशारा शेलार यांनी दिला. आम्ही “मेरी माटी मेरा देशवाले” आहोत. तुमच्यासारखे “माझे कुटुंब माझी जबाबदारी”वाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव

ज्यांची मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये असलेली सत्ता जाण्याची वेळ आलीय, त्यांना महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत. तुमचे खासदार सोडून गेले. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच सगळे पक्ष सोडून गेले. मग तुमची ग्रामपंचायतीत जी सत्ता होती ती तरी टिकेल का? असा सवाल त्यांनी केला.

मुंबईत आलेले उद्योग पळवून लावायचे तुम्ही.. मुंबईत बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला. हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत. हे कालच्या भाषणात जाहीरपणे त्यांनी दाखवले, अशी टीकाही शेलार यांनी केली.

“मी करणार म्हणजे करणारच…” आरक्षण देणार म्हणजे देणारच…! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच…! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच…! अशा गेल्या 10 वर्षांत 1 हजार 531 घोषणा तुम्ही केल्या. आमच्या बॅक ऑफिसने कालच यांची मागची दहा वर्षांतील भाषणे काढली. त्यामध्ये ही आश्चर्यकारक माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही. उद्धव ठाकरे म्हणजे “पोकळ शब्दांचे खोडकळ नेते” आहेत, अशा शब्दांतही त्यांनी टीका केली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content