Homeहेल्थ इज वेल्थहोमिओपॅथीः समज -...

होमिओपॅथीः समज – गैरसमज ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषधप्रणाली आहे. त्वचा व केसांच्या समस्या, श्वसनविषयक समस्या, मानसिक आरोग्य समस्या, कमी रोगप्रतिकारशक्ती, टॉन्सिलिटिस, मायग्रेन, रजोनिवृत्ती, वजन व्यवस्थापन आणि वंध्यत्व यासारख्या विविध आजारांवरील उपचारामधील गुणकारी परिणामांमुळे अनेक देशांमध्ये या पूरक औषधप्रणालीचा सकारात्मकपणे अवलंब केला जातो. भारत २००,००० नोंदणीकृती होमिओपॅथिक डॉक्टर्स / फिजिशियन्ससह जगामध्ये अग्रस्थानी आहे आणि जवळपास १०० दशलक्ष व्यक्ती उपचारासाठी होमिओपॅथीवर अवलंबून आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी वैद्यकीय प्रणाली असूनही होमिओपॅथीबद्दल अनेक गैरसमज अजूनही अस्तित्त्वात आहेत. डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरचे संस्थापक व अध्यक्ष पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी उपचाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते:

होमिओपॅथीने गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र आजाराच्या उपचारांमध्ये उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. परिणामी जुलाब, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार होमिओपॅथिक उपचारांसह त्वरित बरे होत आहेत. संधिवात, दमा, एलर्जी, चिंता आणि नैराश्य यासारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो, कारण या आजारांवर मुळापासून उपचार केले जातात.

गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे:

हा एक सामान्य गैरसमज आहे, ज्यामधून निदर्शनास येते की होमिओपॅथीचे परिणाम फक्त मानसिक असतात आणि त्यांचा शरीरातील शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही. होमिओपॅथीच्या परिणामकारकतेची वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी अनेक क्लिनिकल आणि डबल-ब्लाइण्ड तपासण्या करणत आल्या आहेत. तसेच, होमिओपॅथिक उपचाराने बरे झालेल्या लाखो केसेस वैद्यकीय डेटाद्वारे प्रमाणित केल्या गेल्या आहेत आणि ते त्याच्या वैज्ञानिक परिणामकारकतेचा पुरावा आहेत.

गैरसमज ३: होमिओपॅथी औषधे सुरक्षित नाहीत:

होमिऑपथी हे जगातील सर्वात सुरक्षित औषधोपचारांपैकी एक आहे. याचे कोणतेही घातक किंवा नकारात्मक परिणाम होत नाहीत, कारण ते डायल्यूट केले जाते आणि लहान डोसमध्ये दिले जातात. पण स्वत:हून उपचार सुरू करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होमिओपॅथचा सल्ला घ्यावा.

गैरसमज ४: होमिओपॅथीचा इतर उपचारांसह वापर करता येऊ शकत नाही:

होमिओपॅथीचा वापर इतर उपचारांसोबत करता येतो. होमिओपॅथीकडे येणारे रुग्ण अनेकदा दीर्घकालीन तक्रारी घेऊन येतात आणि ते आधीच इतर प्रकारच्या औषधांचे सेवन करत असतात. ते सेवन करत असलेली काही अ‍ॅलोपॅथिक औषधे अचानक बंद करता येत नाहीत. रासायनिक औषध सेवन करणे थांबवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, होमिओपॅथीचा अवलंब करत इतर प्रकारचे उपचार हळूहळू थांबवणे उत्तम आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content