Homeपब्लिक फिगरवाझे प्रकरण लोकल...

वाझे प्रकरण लोकल तर परमबीरचे नॅशनल?

शिवसेनेशी संबंधित सचिन वाझेंचे प्रकरण लोकल लेव्हलचे असल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांना परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचविण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर पत्रकार परिषदांचा सपाटा सुरू केल्याने त्यांना आता हे प्रकरण बहुतेक राष्ट्रीय पातळीचे वाटले असावे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला.

मुंबईचे माजी पोलीस माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सातत्याने पाठराखण करणारे शरद पवार यांनी आता तरी महाराष्ट्राची बेअब्रू रोखावी व तत्काळ अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करण्याचे आरोप केल्यानंतर हे सर्व आरोप कसे चुकीचे आहेत, ते पत्रच खोटे आहे, पत्रावर शंका व्यक्त होत आहे व त्या पत्रातील नोंदीनुसार सचिन वाझे व गृहमंत्री देशमुख यांची भेटच झाली नसल्याचे तारखांचे दाखले पवार साहेबांनी तातडीने दिले. जर परमबीर सिंह यांनी ते पत्रच लिहिले नसते तर त्यांनी पोलीस सेवेत असतानाही गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल का केली असती याचे उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

पुरावे नष्ट करण्याआधीच गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशीची मागणी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली असेल तर न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिकासुद्धा खोटी आहे का, असा सवालही चंद्रकात पाटील यांनी केला.

दोन दिवस होऊनही महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या या गंभीर पत्राच्या चौकशीचे साधे आदेश अद्यापही महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाहीत. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमध्ये खुद्द शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. ज्याअर्थी पवार यांनी याबाबत कुठेही इन्कार केला नाही, त्याअर्थी या पत्रामध्ये तथ्य असल्याचे सिध्द होत आहे, मग सत्तेच्या लालसेपोटी पवार या प्रकरणात नक्की कोणाच्या कृष्णकृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत असा सवालही तयांनी केला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content