Homeपब्लिक फिगर‘मी पुन्हा येईन..'च्या...

‘मी पुन्हा येईन..’च्या स्वप्नाला अजून २५ वर्षं?

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्षं लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आम्ही फासे फिरवणार आहोत असे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही. गेली २२ वर्षं माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. पण, फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवतानाच सांगितले आहे की, हे सरकार पाचच नाही तर २५ वर्षं टिकणार आहे आणि तेच घडणार असेही ते म्हणाले.

लोकांना मूर्ख बनवण्याचे मोदींचे काम

मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कळत नसेल किंवा कळूनही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम ते करत असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.

मोदींना आजपर्यंत कळलंच नाही की शरद पवार या देशातील कृषी सुधाराचे पक्षकार होते.  तेव्हाही आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते. ते कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची त्यांची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले, ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्य सरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही. पण एकमत निर्माण करणे, लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे गरजेचे असताना अजून रेटण्याची भूमिका पंतप्रधान घेत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही, असेही मलिक म्हणाले.

Continue reading

युद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले रोजचे 17 अब्ज रुपयांचे नुकसान!

इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली...

इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर

इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीच्या ताज्या उद्रेकामुळे मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून खालील गोष्टी दिसून येत आहेत.  1. बालीसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाली आहेत.  2. ज्वालामुखीच्या...

कोरेगावचा योगगुरू देतोय व्हिएतनाममध्ये योगाचे धडे!

साताऱ्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गोपीनाथ खताळ व्हिएतनाममध्ये योगगुरू बनला असून तिथल्या नागरिकांना योगाचे धडे देतोय. शेतकरी कुटुंबातील गणेशची गोष्ट एकदम प्रेरणादायक आहे! गणेशचा जन्म कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला; त्याला लहानपणी शाळेत असताना योगाची...
Skip to content