Homeपब्लिक फिगर‘मी पुन्हा येईन..'च्या...

‘मी पुन्हा येईन..’च्या स्वप्नाला अजून २५ वर्षं?

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्षं लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आम्ही फासे फिरवणार आहोत असे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही. गेली २२ वर्षं माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. पण, फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवतानाच सांगितले आहे की, हे सरकार पाचच नाही तर २५ वर्षं टिकणार आहे आणि तेच घडणार असेही ते म्हणाले.

लोकांना मूर्ख बनवण्याचे मोदींचे काम

मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कळत नसेल किंवा कळूनही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम ते करत असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.

मोदींना आजपर्यंत कळलंच नाही की शरद पवार या देशातील कृषी सुधाराचे पक्षकार होते.  तेव्हाही आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते. ते कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची त्यांची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले, ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्य सरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही. पण एकमत निर्माण करणे, लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे गरजेचे असताना अजून रेटण्याची भूमिका पंतप्रधान घेत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही, असेही मलिक म्हणाले.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content