Homeहेल्थ इज वेल्थकर्करोगाचे 70 टक्के...

कर्करोगाचे 70 टक्के प्रकार टाळणे शक्य!

भारतीय टपाल खाते, मुंबई विभाग यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने कर्करोगासाठी विशेष पाकीट काल जारी केले. जागतिक कर्करोग दिन-2021 निमित्ताने या आजाराबद्दल जागृती करणे व लोकांना त्यांच्या आरोग्याला असणारा कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी सहकार्य करणे ही यामागील उद्दिष्टे होती.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र ए. बडवे, मुंबई आणि  गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी. अगरवाल तसेच  भारतीय टपाल खात्याच्या  मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांनी हे विशेष कव्हर जारी केले. कर्करोगाच्या विविध 100 प्रकारांपैकी 70 प्रकार टाळता येण्याजोगे असतात व या आजाराच्या या गोष्टीबाबत जागृती करणे आवश्यक आहे अशी माहिती डॉ. राजेंद्र बडवे यांनी यावेळी दिली.

भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढीला  लागले आहे. हे प्रमाण शहरात एक लाख लोकसंख्येमागे 100, निमशहरी भागात एक लाख लोकसंख्येमागे 60 ते 70 तर ग्रामीण भागात 40 ते 50 रोगग्रस्त असे आहे. आपण शहरीकरणाची किंमत अशाप्रकारे चुकवत असतो, असे सांगून टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक म्हणाले की, शहरीकरणासोबत येणाऱ्या आरामदायक जीवनशैलीद्वारे आपण कर्करोगाला आमंत्रण देत असतो आणि त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो यावर अभ्यास झालेला आहे.

तंबाखूसेवन आणि लठ्ठपणा या दोन बाबी या जीवघेण्या आजाराला कारणीभूत आहेत. कर्करोगग्रस्तांनी उपचारानंतरही पाच वर्षांपर्यंत नियमित तपासणी करून घेत राहणे आवश्यक असल्याचे डॉ. बडवे यांनी नमूद केले. देशभरात पसरलेल्या विस्तीर्ण टपाल खात्याच्या जाळ्याचे देशातील कर्करोग उपचारामधील लक्षवेधी सहयोगाबद्दल सांगताना डॉ. बडवे यांनी, पूर्वी दुर्गम व ग्रामीण भागातील रूग्ण उपचारानंतरच्या तपासणीसाठी डॉक्टरांना पत्र पाठवत असत याचा उल्लेख केला.

कर्करोगाचे निदान व तपासणी, उपचारानंतरची नियमित तपासणी  याबद्दल  टपाल खात्याच्या महाराष्ट्र विभागीय कर्मचाऱ्यांमध्ये तसेच त्यांच्या कुटुंबियांमध्ये जागृती करण्यासाठी टाटा मेमोरियलच्या सहयोगाने मोहीम सुरू करणार असल्याचे मुंबई व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल  एच. सी. अगरवाल यांनी सांगितले.  ही मोहीम मुंबईपासून सुरू होईल.

कर्करोगाशी लढा देण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना असणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी सांगितले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या वयोगटातील कर्करोगमुक्त सहभागी झाले होते. या रोगाशी झुंज घेतानाचे आपले अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content